Bosch-Company
Bosch-Company 
उत्तर महाराष्ट्र

देशभरातील उत्पादन ‘बॉश’ बंद ठेवणार

सकाळ वृत्तसेवा

सातपूर- वाहन उद्योगातील मंदीच्या पार्श्‍वभूमीवर बॉश ग्रुपने ऑटोमोबाईल क्षेत्रातील कपोनंट तयार करणारे नाशिक, पुण्यासह देशभरातील सर्वच प्रकल्पांत १६ ऑगस्टपासून पुढे आठ ते दहा दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिकच्या प्रकल्पात रोज होणारे ७० हजार इंजेक्‍टर व नोझलचे उत्पादन बंद असेल. येत्या काळात मंदीच्या झळा आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

जगभरातील वाहन उद्योगाला सध्या मंदीचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणाचे जागतिक मानांकन राखण्यासाठी डिझेल इंजिनावर आणलेली बंदी आणि इलेक्‍ट्रिक वाहनाचे धोरण यामुळे जगभर वाहन खरेदीवर परिणाम जाणवत आहे. सध्या ३० टक्के वाहनखरेदी कमी झाली आहे.

त्यामुळे कंपन्यांनी जोपर्यंत स्टॉकमधील उत्पादन खपत नाही, तोपर्यंत नवीन टेक्‍नॉलॉजीचे बीएसयू- ६ इंजिन असलेल्या गाड्या तयार करण्यासाठी त्या-त्या प्रकल्पांत तंत्रज्ञान अपग्रेड करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, त्यामुळे या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या हजारो सुटे भाग बनविणाऱ्या छोट्या-मोठ्या कंपन्या आणि लघुउद्योगांवर मोठा परिणाम बघावयास मिळत आहे. त्यातच बॉश ग्रुपने १६ व १७ आणि २६ ते ३१ ऑगस्टदरम्यान नाशिक, पुण्यासह देशभरातील वाहन उद्योगाशी संबंधित पार्टचे उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

सहा महिन्यांपासून बॉश कंपनीत कामगारकपात, इन-आउट सुरू आहे. गेल्या महिन्यात महिंद्र, बॉश, सीएटसह अन्य मोठ्या कंपन्यांनी उत्पादन बंद ठेवले होते. त्यामुळे या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या व्हेंडर कंपन्या व कामगारांना रोजगार गमवावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT