residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

जिल्ह्याला कांदा अनुदानापोटी १९९ काेटी - ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे

प्रमोद सावंत,सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : राज्यात १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान विविध बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाली होती. या घसरण पोटी या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने एकूण ३८७ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. यात नाशिक जिल्हयातील शेतकऱ्यांना १९९ कोटी इतके कांदा अनुदान मंजूर झाल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी कळविले आहे.

  यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणनमंत्री राम शिंदे यांना श्री. भुसे यांनी कांदा अनुदान तातडीने द्यावे अशी मागणी केली होती.  त्याअनुषंगाने हंगाम २०१८-१९ मध्ये राज्यात ऑक्टोबर २०१८ नंतर बाजारातील कांद्याच्या दरात घसरण झाल्यानंतर १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती व खाजगी बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० रुपये प्रति क्विंटल प्रती शेतकऱ्याला अनुदान देण्याचा निर्णय झाला होता.

   कांदा अनुदानाच्या कालावधीत वेळोवेळी वाढ करण्यात आली होती. सुधारित कालावधी १ नोव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ असा निश्चित करण्यात आला. या कालावधीतील ११४ कोटी ८० लाख रुपये निधी आकस्मिक निधीद्वारे शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी वितरित करण्याची कार्यवाही सुरु आहे. आतापर्यंत १११ कोटी ८१ लाख रुपये इतके कांदा अनुदान वितरित करण्यात आले.

१६ डिसेंबर २०१८ ते २८ फेबु्रवारी २०१९ या कालावधीतील कांदा अनुदान वितरित करण्यासाठी ३८७ कोटी निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त १९९ कोटी रुपये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या आठवडयात वितरित केले जाणार आहे. यासाठी श्री. भुसे यांनी मुख्यमंत्री व पणन मंञ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT