banana poll machine 
उत्तर महाराष्ट्र

"आयटीआय'च्या विद्यार्थ्याची कमाल...पिकांचे खांब काढण्याची तयार केली कटाई मशिन !

सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : काहीतरी नवीन करण्याची जिद्द व त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची इच्छाशक्ती असली, की कोणतेही स्वप्न साकार होत असते. येथील हंसराज राजकुळे या तीस वर्षीय आयटीआय केलेल्या युवकाने केळी, पपई, एरंडी यांसारखे पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर त्या पिकांचे खांब शेतातून काढण्यासाठी एक कटाई मशिन विकसित केले आहे. या मशिनमुळे शेतकऱ्यांची आर्थिक व वेळेची बचत तर होणारच आहे सोबत सदर पिकांचे बारीक-बारीक तुकडे होऊन त्यापासून खतदेखील तयार होणार आहे. 


शेतकऱ्यांनी केळी, पपई, कापूस व एरंडी यांसारख्या पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर विशेषतः केळी व पपईचे खांब काढणीसाठी व काढलेले खांब इतर ठिकाणी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. तसेच अनेकदा काढलेले ते खांब नदी किंवा तलावात फेकण्यात येतात. त्यामुळे बऱ्याचदा नदीतून अथवा तलावातून पावसाचे पाणी वाहण्यासाठी अडथळा निर्माण होतो. हे सर्व हेरून शहरातील हंसराज राजकुळे या युवकाने आपल्याच वर्कशॉपमधील काही टाकावू वस्तू, तर काही नवीन वस्तू विकत घेऊन केळी, पपई, एरंडी आदी पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर त्यांचे खांब काढण्यासाठी एक कटाई मशिन तयार केले आहे. या मशिनमुळे संबंधित पिकांच्या खांबांचे बारीक-बारीक तुकडे होऊन ते जमिनीत मिसळून त्यापासून खतदेखील तयार होणे शक्य आहे. हंसराज राजकुळे यांनी चार दिवसांपूर्वीच हे कटाई मशिन तयार केले असून, त्याचा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांचा शेतातील केळी पिकांचे खांब काढण्यासाठी करण्यात आला आहे व तो मोठ्या प्रमाणावर यशस्वीदेखील झाला आहे. 

मशिनची निर्मिती 
हंसराज राजकुळे या युवकाने आयटीआय केले असून, याआधीही त्यांनी कूपनलिकामधील मोटार काढण्यासाठी मशिन बनविले आहे. त्यांनी हे मशिन तयार करण्यासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील पत्रा, चार इंच सी चॅनल, पाटा, एक्सेल, पिष्टन इत्यादी साहित्याचा वापर केला आहे. मशिन बनविण्यासाठी त्यांना सात दिवस लागले असून, त्यासाठी त्यांना भूषण सूर्यवंशी, रमेश मगरे, सुरेश पाडवी, लक्ष्मण ड्रायव्हर यांनी मदत केली आहे. 

मशिनची कार्यपद्धती 
हे कटाई मशिन ४५ एच. पी. व त्यापुढील ट्रॅक्टरला जोडल्यावर काम करते. ट्रॅक्टरच्या पुढील भागाद्वारे खांब खाली पाडण्यात येते व त्यानंतर खाली पडलेले खांब ट्रॅक्टरच्या खालून ट्रॅक्टरला जोडलेल्या या मशिनमध्ये जाते व त्यानंतर मशिनच्या धारदार पात्यांमध्ये खांब आल्यानंतर त्याचे लहान लहान तुकडे होतात. हेच तुकडे जमिनीत मिसळल्यानंतर त्यापासून खत तयार होते. 

शेतकऱ्यांची आर्थिक, वेळेची बचत होणार 
साधारणतः १० एकर शेतातील केळीचे खांब काढण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास २०-२५ हजार खर्च येऊन सात दिवसांचा कालावधी लागतो. मात्र या मशिनच्या सहाय्याने ते खांब एका दिवसात निघू शकतात व त्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. त्यामुळे या मशिनच्या सहाय्याने पपई, एरंडी व केळीचे खांब काढल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक व वेळेची बचत होणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT