People from all over the state are coming to Trimbakeshwar on the occasion of Sant Nivrittinath Maharaj Yatra. Dindyas are also leaving for Trimbakeshwar.
People from all over the state are coming to Trimbakeshwar on the occasion of Sant Nivrittinath Maharaj Yatra. Dindyas are also leaving for Trimbakeshwar. esakal
नाशिक

Sant Nivruttinath Yatrotsav : टाळ- मृदंग अन माउलींच्या नामस्मरणात; जिल्ह्यातील पालख्या विसावल्या गोदातीरी

सकाळ वृत्तसेवा

Sant Nivruttinath Yatrotsav : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पौषवारी रविवार (ता. ४)पासून सुरू होत आहे. माउलींच्या जन्म सप्तशतकोत्तरी वर्षाचे औचित्य साधत यंदा दिंड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

या दिंड्या व पालख्या शहर आणि परिसरात मुक्कामी असून, दिवसभर शहराच्या विविध भागांत माउलींच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांमुळे पावलोपावली भक्तिभावाची अनुभूती मिळत होती. ()

त्र्यंबकेश्‍वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संस्थानाकडे नोंदणीकृत साडेचारशे दिंड्या आहेत. गेल्या वर्षी चारशेच्या आसपास दिंड्या त्र्यंबकनगरीत दाखल झाल्या होत्या. यंदा ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून कल्याण भागातून एक दिंडी येते; तर उर्वरित दिंड्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल होतात.

एका दिंडीत साधारण दोनशे ते तीनशे वारकरी असतात. काही गावांमधून दिंडीचे स्वतंत्र आयोजन केले जाते; तर छोट्या गावातील दिंड्यांचे पुढे सर्वांच्या सोयीसाठी एकत्रिकरण केले जाते. शहरात उद्याही (ता. ४) दिंड्या दाखल होतील. यंदा चांदवड, निफाड, नांदगाव तालुक्यांतील अनेक गावांतील विहिरींनी जानेवारीतच तळ गाठला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीची फारशी कामे नसल्याने दिंड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे काही दिंडीकऱ्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना सांगितले. शहरात आज सकाळपासून दिंड्या दाखल झाल्या असून, त्यांचा मुक्काम शहराच्या विविध भागांत आहे.

खांद्यावर भगवे ध्वज, टाळमृदंगाच्या साथीने मुखी हरिनामाचा गजर करीत वारकरी पायी त्र्यंबकेश्वरकडे जात आहेत.

दिंड्यांचा नित्यक्रम

मुक्कामी ठिकाणी थांबलेल्या दिंड्यांतील वारकरी भल्या पहाटेच उठून नित्यकर्म उरकतात. त्यानंतर त्या पहाटे चार ते पाचच्या दरम्यान पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होतात. यातील अनेक दिंड्यांना ५० हून अधिक वर्षांची परंपरा आहे. या दिंड्यांच्या मुक्कामाची, भोजनाची व नाश्‍त्याची व्यवस्था आधीच ठरलेली असते.

त्याठिकाणी यजमानांकडून दिंडीकऱ्यांच्या भोजनाची, रात्रीच्या मुक्कामासह दुसऱ्या दिवशी सकाळी चहा-पाण्याची व्यवस्था केली जाते. यात काही ठिकाणी गावकरी एकत्र येत हा सोहळा पार पाडतात. याशिवाय, अनेक कुटुंबांकडून वर्षानुवर्षे या दिंडीकऱ्यांच्या जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था केली जाते.

''संत निवृत्तिनाथ महाराजांची पौषवारी व सप्तशतकोत्तरी जन्मोत्सव यंदा एकत्र आल्याने या पौषवारीला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. संस्थानतर्फे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले असून, लवकरच भव्य दगडी सभामंडप आकारास येत आहे.''- प्रा. अमर ठोंबरे, विश्‍वस्त व प्रसिद्धीप्रमुख संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्‍वर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT