water
water 
उत्तर महाराष्ट्र

'सकाळ' च्या कामामुळे वाढली भूजल पातळी 

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सामाजिक कार्यात सहकार्य करणाऱ्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या रिलीफ फंडातून राजमाने (ता. चाळीसगव) येथे करण्यात आलेल्या नाला खोलीकरणाच्या कामामुळे या भागातील भूजल पातळी वाढली आहे. मागीलवर्षी एक हजार फूट खोलवर असलेल्या कूपनलिका सद्यःस्थितीत अवघ्या दोनशे फुटांवर स्थिरावल्या आहेत. या पाण्याचा शेती सिंचनासाठी उपयोग होत असल्याने शेतकरी सुखावले आहेत. या भागात काल (३ जुलै) झालेल्या दमदार पावसामुळे अल्पावधीतच या बंधाऱ्यात नऊ कोटी लीटरचा जलसाठा झाला आहे. तीन वर्षांनंतर पहिल्यांदा एवढा मोठा जलसाठा झाल्याने राजमानेवासीयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. 

राजमाने (ता. चाळीसगाव) गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. मागीलवर्षी ‘सकाळ रिलीफ फंड’मधून तनिष्का सदस्यांच्या पुढाकाराने येथे नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले. मागीलवर्षी या भागात पाऊस कमी झाल्याने नाला पाहिजे तेवढा भरला नव्हता. मात्र, तरीही मागीलवर्षी नाल्यातील पाण्यामुळे शेती व गुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. 

दीड किलोमीटरचे खोलीकरण 
राजमानेच्या ग्रामस्थांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जवळच्या कळमडू (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी व सध्या पुणे येथे संगणक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या गुणवंत सोनवणे यांच्यासह सरपंच कविता पाटील, तुषार पाटील, शुभम निकम, प्रकाश निकम, राजू पवार, निंबा पाटील, वाल्मीक केदार, शिवदास निकम यांच्यासह ग्रामस्थांच्या सहकार्याने जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी ‘सकाळ’च्या ‘तनिष्का’ गटाच्या महिलांनी पुढाकार घेतला. सकाळ माध्यम समूहाकडे निधीची मागणी ‘तनिष्कां’नी केल्यानंतर ‘सकाळ रिलीफ फंड’मधून निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार, सुमारे दीड किलोमीटरपर्यंत नाला खोलीकरणाचे काम मे २०१८ मध्ये करण्यात आले. काल या भागात झालेल्या दमदार पावसामुळे नाले भरून निघाले आहेत. ‘सकाळ रिलीफ फंड’मधून खोलीकरण केलेल्या नाल्यात तब्बल नऊ कोटी लीटर पाण्याचा साठा झाला आहे. या पाण्याचा परिसरातील सुमारे दीडशे हेक्टरला लाभ होणार आहे. 

‘सकाळ’मुळे राजमाने झाले टँकरमुक्त 
राजमाने गावात जलसंधारणाचे काम झाले होते. दुष्काळ असतानाही मागीलवर्षी झालेल्या नाले खोलीकरणाच्या कामामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. ‘सकाळ रिलीफ फंड’मधून काम होण्यापूर्वी गावात एक हजार फूट बोअरवेल खोल करूनही पाणी लागत नव्हते. ‘सकाळ रिलीफ फंड’मधून काम झाल्यानंतर मागीलवर्षी साचलेल्या नाल्यातील पाणीसाठ्यामुळे दोनशे फुटांवर बोअरवेलला पाणी स्थिरावल्याचे चित्र दिसत आहे. सद्यःस्थितीत गावातील दोन्ही हातपंपांना पाणी लागल्याने गावाचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राजमाने गावात पाण्याचा एकही टँकर लागला नाही. केवळ ‘सकाळ’मुळे आमचे गाव टँकरमुक्त झाल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत. गुरांनाही पाण्याचा तुटवडा भासला नाही. काही शेतकऱ्यांच्या कापूस उत्पन्नात दुष्काळ असतानाही दहा क्विंटल व त्यापेक्षा जास्तीने वाढ झाली. राजमाने व कळमडू गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. यंदाच्या पावसाळ्यात सर्वत्र खोलीकरण झालेल्या भागात चांगल्या पावसामुळे पाणी जमा झालेले दिसत आहे. आता या नाल्यात नऊ कोटी लिटर पाण्याचा साठा झाल्याने जणू जलक्रांती निर्माण झाली आहे. 

समस्या मांडण्यापासून ते सोडविण्यापर्यंत ‘सकाळ’चा पुढाकार 
राजमाने येथील पाणी समस्येसंदर्भात मागील वर्षी २०१८ मध्ये मे महिन्यात सर्वप्रथम ‘सकाळ’ने वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले होते. यात ‘विजेने पळविले राजमानेकरांचे तोंडचे पाणी’ तसेच ‘राजमाने येथे पाच वर्षांत पाणीपुरवठा योजनेतून पाच वेळाच पाणी’ या मथळ्यांखाली बातम्या प्रसिद्ध केल्या. त्या ‘सकाळ’च्या माध्यमातून ‘ट्विटर’ व ‘व्हाट्‌सॲप’वर ‘व्हायरल’ झाल्या. केवळ या समस्या मांडण्यापुरता ‘सकाळ’ची भूमिका मर्यादित राहिला नाही, तर ही समस्या सोडविण्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला. त्यानुसार, ‘तनिष्कां’च्या माध्यमातून प्रत्यक्षात नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले. आज याच नाल्यात मुबलक पाणीसाठा झाल्याने ग्रामस्थ ‘सकाळ’ला धन्यवाद देत आहेत. 

तनिष्का गटाच्या माध्यमातून ‘सकाळ रिलीफ फंड’मधून चाळीसगाव तालुक्यात जल व्यवस्थापन व जलसंधारणाची मोठी कामे झाली आहेत. जलशक्तीच्या कार्यात ‘सकाळ’ने मोठी मोहीम हाती घेतली आहे. ज्या-ज्या गावांमध्ये अशी कामे झाली, त्या- त्या गावांमध्ये जलसाठा वाढत आहे. राजमाने येथील केलेल्या कामाची ही पावती आहे. या कामाचा राज्यातील इतर गांवानी आदर्श घ्यावा. खऱ्या अर्थाने गावे पाणीदार करण्यासाठी जलव्यवस्थापनात ‘सकाळ’ची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. 
- गुणवंत सोनवणे, संगणक अभियंता, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT