Buldhana News
Buldhana News sakal
उत्तर महाराष्ट्र

Buldhana News : महसूल विभागाकडून क्लिन चिट ; कर्मचाऱ्यांसह अधिकारी हतबल

सकाळ वृत्तसेवा

शेगाव(जि-बुलढाणा) : संशयावरून केलेल्या कार्यवाही वर तहसीलदारांच्या पत्राने फेरले पाणी शेगाव पोलिसांनी पकडलेला तांदळाचा तो ट्रक अखेर 6 दिवसांनी सोडण्यात आला. सदर ट्रक मधील तांदूळ रेशनचा नसल्याचा अहवाल महसूल च्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ट्रक पोलिसांना सोडावा लागला.

संग्रामपूर कडून शेगाव कडे 600 कट्टे तांदूळ घेऊन जाणारा ट्रक येत असताना शेगाव नजीक अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाने पकडून पोलीस स्टेशनमध्ये लावला होता. व ट्रक मधील तांदूळ तपासणी संदर्भात महसूल विभागाला पाचारण करण्यात आले होते. 21 मार्च रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान ही कारवाई करण्यात आली होती.

त्यावर तहसीलदार शेगाव यांचे कडे हा तांदूळ नेमका रेशनचा आहे की नाही याची पडताळणी करणे साठी पोलिसांकडून पत्र पाठवण्यात आले होते. त्या नुसार शेगाव तहसीलदार यांनी संग्रामपूर तहसीलदार यांचेशी पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. संग्रामपूर तहसीलदार यांनी रेशन दुकांनचा अहवाल घेऊन या सदर तांदूळ वैयक्तिक असून रेशन चा संबंध नसल्याचा खुलासा दिला. 300 क्विटल असलेला तांदूळ रेशन चा सिद्ध होऊ शकला नाही म्हणून शेगाव पोलिसांनी तो ट्रक सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे.

या बाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांचेशी संपर्क केला असता गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तांदुळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र महसूल च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातून क्लीन चिट देण्यात आल्याने ताब्यात घेतलेला तो ट्रक सोडण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT