Girna Dam
Girna Dam 
उत्तर महाराष्ट्र

गिरणातून पिण्यासाठी आवर्तन सुटले

शिवनंदन बाविस्कर

पिलखोड(ता. चाळीसगाव) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये गिरणा धरणातून काल(ता.3, मंगळवार) दुपारी एकला आवर्तन सोडण्यात आले. यामुळे गिरणाकाठच्या शहरांसह गावांमध्ये पाणी टंचाई मिटण्यास मदत होणार आहे. 

जिल्ह्यातील पाचोरा शहरासह अन्य गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. नागरिकांना पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागत आहे. 

दरम्यान, पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार काल(ता. 3, मंगळवार) दुपारी एकला धरणातून 1 हजार 500 क्यूसेक एवढे आवर्तन सोडण्यात आले. अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. या आवर्तनामुळे पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. तसेच हे आवर्तन फक्त पिण्यासाठीच असल्याने त्याचा इतर कुठल्याच कामांसाठी उपयोग करू नये, तसे आढळल्यास पाटबंधारे विभागाकडून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

SCROLL FOR NEXT