file photo
file photo 
विदर्भ

कोरोनाने ग्रामीण भागात केली पंचाईत...शिक्षकांसमोर विद्यार्थी मिळविण्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : महापालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसमोर आता विद्यार्थी कसे मिळवायचे, असा नवीन प्रश्‍न उभा ठाकला आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी मिळवण्यासाठी फिरणे कठीण झाले असतानाच ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

मात्र या शाळांना पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने यंदा पहिली व पाचवीची तुकडी कशी सुरू करायची, असा प्रश्‍न उभा ठाकला आहे. नवे शैक्षणिक सत्र केव्हा व कसे सुरू होणार हे, निश्‍चित नसल्याने शिक्षक पुरते चिंताग्रस्त झाले आहेत.

तुकडी टिकविण्याचे आव्हान

24 मार्चपासून कोरोना विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या. धड परीक्षाही घेता आल्या नाहीत. निकाल घटक चाचणी व प्राथमिक सत्रांत परीक्षांमधील गुणांच्या आधारे सरासरीवर लावावे लागले. यात सर्व विद्यार्थी पास झालेत. चौथीतून पाचवीत गेलेले व पहिल्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी मिळवणे, तुकडी टिकवण्यासाठी शिक्षकांना अनिवार्य आहे.

नोकरी वाचविण्यासाठी शिक्षकांची धडपड

नामांकित खासगी शाळांकडेच पालकांचा कल अधिक राहत असल्याने महापालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांना विद्यार्थ्यांची वानवा असते. दरवर्षी निकाल जाहीर होताच या शाळांमधील शिक्षक विद्यार्थी मिळवण्यासाठी फिरतात. अनेक प्रकारचे आमिष देत विद्यार्थी मिळवतात व तुकडी जिवंत ठेवून नोकरी वाचवतात हे वास्तव आहे. यंदा संचमान्यतेचे बंधन नसले व नोकरीवर गदा येणार नसली; तरी तुकडी चालणार कशी, हा प्रश्‍न कायम आहे. एक वर्ष तुकडी चुकली तर त्याचे परिणाम पुढील दहा वर्ष भोगावे लागतील.

खासगी शाळांचे ऑनलाइन अर्ज

काही खासगी शाळांनी ऑनलाइन प्रवेश सुरू केले आहेत. मनपा व जिल्हा परिषदेच्या शाळांनीही हीच पद्धत सुरू केली आहे. या शाळांमध्ये साधारणतः गरीब कुटुंबातील विद्यार्थी येतात. त्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत. माहितीतील पालकांसोबत फोनवरून संपर्क साधला; तरी अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रत्यक्ष भेट अनिवार्य आहे. त्यासाठी लॉकडाउन उठणे आवश्‍यक आहे, असे शिक्षकांनी म्हटले आहे.

विद्यार्थी प्रवेशासाठी आमिष

महापलिका व जिल्हा परिषदांच्या शाळेत प्रवेश घ्यावा ही विद्यार्थ्यांची नाही तर शिक्षकांची गरज बनली आहे. विद्यार्थी मिळावेत म्हणून पाल्यांना सायकल, दप्तर, टिफिन, वॉटरबॅग, शूज, वह्या घेऊन देण्याचे आमिषे द्यावी लागतात. पालकांच्याही काही अटींची पूर्तता शिक्षकांना करावी लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT