विदर्भ

गुंडप्रवृत्तीमुळेच 'निमंत्रण वापसी'

वृत्तसंस्था

यवतमाळ- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ), ता.13 : गुंडप्रवृत्तीमुळेच 'निमंत्रण वापसी'चा निर्णय साहित्य संमेलनाच्या आयोजकांना घ्यावा लागला. या निर्णयामुळे मन अतिशय दुःखी झाले. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्या, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या राणी बंग यांनी खडे बोल सुनावले. ज्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात, त्यांनी इंग्रजी लेखिकेला विरोध करावा का, असा परखड सवालही त्यांनी उपस्थित केला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित प्रतिभावंतांच्या सहवासात या कार्यक्रमात राणी बंग रविवारी सहभागी झाल्या होत्या. स. ना. पंडित आणि मोना चिमोटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बंग म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून संमेलनात गोंधळ सुरु आहे. पण तो दुःख देणारा आहे. एखादा पाहुणा न बोलावताही आला तरी आपण त्याचे आनंदाने स्वागत करतो, ही आपली संस्कृती आहे. तिचा विसर पडता कामा नये. आम्हाला अशा प्रकारचे अनुभव भारतातच काय परदेशात सुद्धा आले नाहीत."

बंग म्हणाल्या, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे नव्या पिढीने समजून घ्यायला हवे. वाट्टेल तसे वागायचे, धिंगाणा घालायचे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. स्त्रियांचे नग्न मोर्चे हे सुद्धा चुकीचे आहेत. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातील नीती, नियम, मूल्य पाळणे आवश्यक आहे. पण आधुनिकता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागले जात आहे. परदेशातील गोष्टी स्वीकारताना त्यांची शिस्तता, स्वच्छता आपण स्वीकारतो का? "

खरा सुसंस्कृत कोण? 
आदिवासी समाजात चोरी होत नाही. त्यांच्या घराला कुलूप नसते. ते भीक मागत नाहीत. मुलाच्या लग्नात हुंडा मागत नाहीत. मुलगा-मुलगी असा भेदभाव ते करत नाहीत. स्त्रियांवर अत्याचार करत नाहीत. त्यांच्यात सामूहिक निर्णय प्रक्रिया आहे. हे सगळे पाहून माझ्या मनात 'खरा सुसंस्कृत कोण', असा प्रश्न पडतो, असे बंग यांनी सांगितले.

राणी बंग म्हणाल्या
- गोरेपणाला समाज विनाकारण महत्व देतो. असण्याला महत्व असावे कि दिसण्याला?
- प्रत्येक मुल वेगवेगळे असते. सर्वांना एकाच चौकटीत बसवू नका
- आमचे आणि आमच्या मुलांचे शिक्षण मराठीतून, याचा कधीही पश्चात्ताप नाही
- तंत्रज्ञानामुळे नात्यात दुरावा वाढत आहे. पालकांनी मुलांशी संवाद साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT