File photo
File photo 
विदर्भ

अकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ

राजेश रामपूरकर

अकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ
नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या साडेअकरा महिन्यांत 17 वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. तर मध्य प्रदेशात अकरा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक 23 वाघ मृत्युमुखी पडले आहेत.
महाराष्ट्रात 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबरदरम्यान 17 वाघांचा मृत्यू झाला असला तरी त्यातील तीन बछडे गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये जन्मतः मरण पावले होते. हे वाघ रेस्क्‍यू सेंटरमधील असल्याने वन विभागाकडे त्याची नोंद नसली तरी वाघांच्या मृत्यूची संख्या 17 वर गेली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत वाघांच्या मृत्यूचा आकडा घसरला ही राज्यासाठी कौतुकाची बाब असली तरी अद्याप दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. वाघांच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात आहे. येथे आठ वाघांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रेल्वेने धडक दिल्याने मृत्यू झालेल्या तीन बछड्यांचा त्यात समावेश आहे.
नागपूर जिल्ह्यात पाच, जळगावमध्ये दोन, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एका वाघाचा मृत्यू झाला आहे. 23 जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विभागात नैसर्गिकरीत्या पहिला वाघ मरण पावला होता. आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक सात वाघ राज्याने गमावले. मध्य प्रदेशात 23, महाराष्ट्र 17 आणि त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये 11 वाघ मरण पावले आहेत. देशभरात आतापर्यंत एकूण 89 वाघ मरण पावले असल्याची माहिती पुढे आली आहे.

वर्ष - मृत पावलेल्या वाघांची संख्या
2018 (15 नोव्हेंबरपर्यंत) - 17
2017 - 21
2016 - 16
2015- 14

मृत्यूची कारणे
10- नैसर्गिक
3- रेल्वे अपघात
3- रेस्क्‍यू सेंटरमध्ये जन्मानंतर मृत्यू
1- शिकार

शिकाऱ्यांपेक्षा रस्ते, रेल्वेच्या अपघातात वाघ व वन्यजीव ठार होण्याचा धोका वाढतो आहे. त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
- कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT