Dikshabhumi
Dikshabhumi esakal
नागपूर

Dikshabhumi : बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करून बाबासाहेबांनी आशियातील बौद्ध राष्ट्रांना जोडणारा आंतरराष्ट्रीय सेतू बांधला

CD

Develop Countries & Technology : युद्ध न करता जिंकता येणारा, समता आणि बंधुतेची शिकवण देणारा बुद्ध धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात दिला. यामुळे दीक्षाभूमी जगाच्या नकाशावर आली. आता जगभरातील बौद्धांच्या नव्हे, तर अखिल मानवाच्या आकर्षणाचे केंद्र दीक्षाभूमी आहे. विकसित देशाचा विकास हा बुद्ध तत्त्वज्ञानानेच झाला आहे. यामुळेच दीक्षाभूमीच्या विकासाचे पर्व सुरू झाले असून आराखडा तयार झाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

दीक्षाभूमीवर आयोजित ६७ व्या धम्मचक्रप्रवर्तन सोहळ्यात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून थायलंडच्या डॉ. अफिनिता चाई चाना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार कृपाल तुमाने, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलिस आयुक्त डॉ. अमितेशकुमार, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुरुवातीला दीक्षाभूमी विकासाचे ऑनलाईन भूमिपूजन झाले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले, ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा देऊन दलित पीडित समाजाला स्वाभिमान दिला, मानवता धर्म दिला ती दीक्षाभूमी! दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी ही पवित्र स्थळे आहेत. या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी २०० कोटींचा आराखडा तयार करून प्रशासकीय मान्यता दिली आहे. या स्थळांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

माझ्या भारताचे संविधान सर्वोत्तम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माझ्या भारत देशाला दिलेले संविधान सर्वांत सुंदर आहे. यामुळेच जगात पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचला गेला आहे. संविधानात बुद्धाच्या धम्मातील तत्त्वांचा समावेश आहे, तीच मार्गदर्शक तत्त्वे म्हणून संविधानाने स्वीकारली आहेत. यामुळेच संविधानाने समता प्रस्थापित झाली. संविधानाने बंधुता प्रस्थापित केली.

डिसेंबर २०२४ पर्यंत इंदू मिल स्मारक तयार


डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळत नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळवून दिली. तिथे कामाची गती वाढली असून डिसेंबर २०२४ पर्यंत इंदू मिल स्मारक पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लंडनमध्ये ज्या निवासात बाबासाहेब राहिले ते घर सरकारने विकत घेतले. तेथे स्मारक उभारले. आता भारतातून लंडनमध्ये जाणारे बाबासाहेबांच्या त्या निवासस्थानाचे दर्शन घेतात.

राष्ट्रनिर्माणात बाबासाहेबांचे योगदान मोठे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान स्वीकारले. देशाला मानवतावादी संविधान दिले. त्या संविधानावर देश प्रगती करीत आहे. राष्ट्रनिर्माणात बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे, तर बुद्धाच्या विचारात विश्वकल्याणाचे सूत्र आहे. देशभरातील बौद्ध स्थळे व बौद्ध लेणी असलेली शहरे जोडण्यासाठी बुद्धिस्ट सर्किटची संकल्पना आणली आहे, ती लवकरच साकारेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

बौद्ध राष्ट्रांना जोडणारा सेतू! धम्मदीक्षा दिनाची नोंद जागतिक इतिहासात सुवर्णक्षराने झाली आहे. याच दिवशी लाखो लोकांना बाबासाहेबांनी सामाजिक विषमतेच्या बंधनातून मुक्त केले. त्यांना स्वाभिमान दिला. मानवजातीला शांतीचा संदेश दिला. भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करून बाबासाहेबांनी दक्षिण-पूर्व आणि पूर्व आशियातील बौद्ध राष्ट्रांना जोडणारा आंतरराष्ट्रीय सेतू बांधला आहे, असे मत थायलंडच्या डॉ. अफनिता चाई चाना म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT