Hunkar-Sabha
Hunkar-Sabha 
विदर्भ

राममंदिरसाठी संघटित व्हा - ऋतंभरा

सकाळवृत्तसेवा

नागपूर - बाळ रडत नाही, तोपर्यंत आईही त्याला स्तनपान करीत नाही असे नमूद करीत संघटित होऊन राममंदिरची मागणी सरकारकडे लावून धरण्याचे आवाहन साध्वी ऋतंभरा यांनी आज येथे केले. निवडणुकीदरम्यान राजकीय नेते हिंदूंची पक्ष, जातीमध्ये विभागणी करतात. राममंदिर हिंदूंच्या भावनेचा विषय असून त्यासोबत खेळू नका, असा इशाराही त्यांनी राजकीय नेत्यांना दिला. 

राम मंदिर ही सर्वोच्च न्यायालयाची प्राथमिकता नाही, यापेक्षा हिंदूंचा मोठा अपमान कुठलाच नाही, असा संताप व्यक्त करीत त्या म्हणाल्या, राममंदिराचा मुद्दा कायद्यात अडकवून टाकू, असे अनेकांना वाटते. आम्हाला संयम राखता येतो, तसेच वेळप्रसंगी शस्त्रही उचलता येते. आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करायची नाही. आता संघटितपणे प्रदर्शनाची गरज आहे. परंतु, हिंदूंची शक्ती पक्षांमध्ये विभागली आहे. मुस्लिम नव्हे तर काही हिंदूच इर्ष्येपोटी राममंदिराला विरोध करीत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

हिंदूच विभक्त होईल तर मंदिर कसे होईल, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी संयुक्तपणे लढा  न दिल्यानेच न्यायालयही न्याय देत नसल्याचे त्या म्हणाल्या. आता सरकारकडून कायद्याची अपेक्षा असून यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्व अडचणींवर मात करून राम मंदिर करणारच, असा संकल्प करा, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी विदर्भाच्या भूमीचा दंडकारण्य असा उल्लेख करीत प्रभू श्रीरामचंद्र यांना येथेच देवत्व प्राप्त झाल्याचे सांगितले.

सरसंघचालकांची आज्ञा मोदींनी पाळावी!
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कायदा करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे आपल्या भाषणात नमूद केले होते. हाच धागा पकडून साध्वी ऋतंभरा यांनी सरसंघचालकांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज्ञा म्हणून स्वीकारावे, असे मत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT