file 
विदर्भ

सरपंच पायउतार, पण म्हणतात, मी पुन्हा येईन !

सकाळ वृत्तसेवा

कुही (जि.नागपूर) ः तालुक्‍याची व्यापारीनगरी म्हणून ओळखल्या जाणारी मांढळ नगरीचे सरपंच शाहू कुलसंगे यांना सहा महिन्यांपेक्षा ग्रामपंचायतीमध्ये सतत गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेचे प्रशासक संजय यादव यांनी सरपंचपदावरून पायउतार केल्याचा आदेश दिला. कुलसुंगे यांनी उच्च न्यायालयात न्यायासाठी प्रकरण दाखल केले व त्यांना या प्रकरणी स्थगिती मिळाली. म्हणून मी पुन्हा येईन, असे म्हणत ठाम आहेत.

209 दिवस गैरहजर असल्याचा ठपका
सरपंच शाहू कुलसंगे 31 ऑक्‍टोबर 2018 ते 29 मे 2019 या कालावधीतील ग्रामपंचायतीच्या एकूण सात मासिक सभेला गैरहजर असल्याचे दिसून आले. कुही पं. स.च्या गटविकास अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीवरून चौकशी केली असता सरपंच हे सतत सहा महिन्यांपेक्षा जास्त (209 दिवस)कालावधीकरिता गैरहजर असल्याने त्यांच्याविरुद्ध मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार चौकशीसाठी प्रकरण जिल्हा परिषदेकडे आले. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी व प्रशासक संजय यादव यांनी सरपंच शाहू कुलसंगे यांना त्याची बाजू मांडण्याकरिता 15ऑगस्ट, 12 सप्टेंबर, 24 सप्टेंबर, 3 ऑक्‍टोबर, 15 ऑक्‍टोबर तसेच 19 नोव्हेंबरला सुनावणीकरीता बोलाविले होते. 3 ऑक्‍टोबर व 19 नोव्हेंबरला झालेल्या चौकशी व सुनावणीत सरपंच कुलसंगे गैरहजर होते. नंतर त्यांनी 19 नोव्हेंबरला याप्रकरणी आपले लेखी निवेदन सादर केले. त्यात सरपंच शाहू कुलसंगे यांनी उच्च रक्तदाब असल्यामुळे पक्षघातासारखा आजार झाल्याचे कारण नमूद केले. त्यांनी सुट्टीवर जात असल्याचे पं. स. कुहीच्या सभापतींना पत्राद्वारे कळविले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी मासिक सभेची नोटीस तामिल करणे, नागरिकांना दाखले देणे, जन्म व मृत्यू दाखले याची योग्य तपासणी करून सचिवांकडे नियमित पाठविणे, मासिक सभेला नियमित हजर राहणे व पाच-सहा महिने हजर नव्हतो. परंतु, गैरअर्जदार यांनी माझी खोटी तक्रार देऊन मला नाहक त्रास देत असल्याचे बयाणात म्हटले आहे.

उच्च न्यायालयात आव्हान
याअर्थी सरपंच शाहू कुलसंगे यांनी त्यांच्या लेखी युक्तिवादात मुक्त झाल्याने तसेच युक्तिवादासोबत दोषमुक्त होण्याबाबत कोणतेही ठोस पुरावे चौकशी व सुनावणीदरम्यान मांडले नाही. तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार सरपंच शाहू कुलसंगे हे ग्रामपंचायतीच्या 31 ऑक्‍टोबर 2018ते 29 मे 2019 या कालावधीत सात सभांना सहा महिन्यांपेक्षा जास्त म्हणजेच 180 दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 40/1-ब नुसार त्यांना सरपंचपदावरून रिक्त करीत असल्याचा आदेश फर्मावला आहे.परंतु, या आदेशाला कुलसुंगे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्यामुळे त्यांच्या प्रकरणाला स्थगिती मिळाली असल्यामुळे ते मी पुन्हा परत येईल, असा राग आळवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT