file photo
file photo 
विदर्भ

तूर, हरभऱ्याचे अनुदान केव्हा

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा  (जि.नागपूर ) : शासनाने तूर व हरभरा खरेदी न करता ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा तर केली होती. पण, याला आता दोन वर्षे होत आली तरी अद्याप ही नरखेड तालुक्‍यातील शेकडा शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे. 2017 - 8 मध्ये तूर व हरभरा या पिकांचे भाव खुल्या बाजारात कमालीचे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्यांचा माल शासनाला विक्री करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती. पण, नरखेड येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, केंद्र सरकारने खरेदी न करताच बंद केले. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल घरीच पडून राहिला. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाल्याने शासन नमले. खरेदी केंद्र सुरू न करता नोंदणी करणाऱ्यांना प्रतिक्विंटल हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा माल खुल्या बाजारात कमी भावात विकला व शासनाच्या अनुदानाची वाट पाहत बसले. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नरखेड तालुक्‍यातील जवळपास 300 शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान मिळाले नाही.नोंदणी झालेल्या मात्र खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांचे बॅंक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक नाही किंवा त्यांचे बॅंक खाते बंद आहे अशा शेतकऱ्यांची यादी जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली होती. मात्र, सर्व व्यवस्थित असताना अनुदान जमा झालेले नसल्याने आता तरी ते तत्काळ देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दुष्काळाची झळ पोहोचली
मागील वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही निघाला नाही. यामुळे शेतकरी कफल्लक झाला. यावर्षीच्या खरीप हंगाम करण्यासाठी पैसाच नाही. बॅंका ही शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्यामुळे आता तरी शासनाने त्यांचे हक्काचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी शेतकरी वारंवार करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitesh Sharma PBKS vs SRH : पंजाब किंग्जनं पुन्हा कर्णधार बदलला; जितेश शर्मा हंगामच्या शेवटच्या सामन्यात करणार नेतृत्व

Buldhana Latest News : मोठा अनर्थ टळला! चारधाम यात्रेसाठी निघालेले बुलडाण्याती ३० प्रवासी थोडक्यात बचावले

Priyanka Gandhi : ''माझ्या आजीला, वडिलांना तुम्ही देशद्रोही म्हणणार, मग...'' प्रियांका गांधींचा भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT