देशात रोखीलाच प्राधान्य; रिझर्व्ह बॅंकेचा अहवाल

देशात रोखीलाच प्राधान्य; रिझर्व्ह बॅंकेचा अहवाल

नवी दिल्ली  - देशात अद्यापही बहुतांश व्यवहार रोखीनेच होत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहारांमध्येही वाढ होत आहे, असे रिझर्व्ह बॅंकेच्या अभ्यास अहवालातून समोर आले आहे. 

एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत व्यवहारात असलेले चलनी नोटांचे मोठे प्रमाण हे आर्थिक व्यवहारांसाठी रोख रकमेचाच वापर होत असल्याचेच निदर्शक आहेत, असे या अभ्यास अहवालात म्हटले आहे. या निष्कर्षावर भारतात रोखीने होणाऱ्या व्यवहारांना अजूनही मोठे स्थान असल्याचे दिसते आहे, असे यात म्हटले आहे. ऑक्‍टोबर 2014 ते ऑक्‍टोबर 2016 या कालावधीत देशातील चलनी नोटांच्या वापरात 14 टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती. 

ऑक्‍टोबर 2019 मध्ये देशातील चलनी नोटांचा वापर 26 ट्रिलियन रुपयांवर पोचणे अपेक्षित होते मात्र, प्रत्यक्षात हे प्रमाण 22.3 ट्रिलियन रुपयांवर गेले. याचाच अर्थ देशात डिजिटल व्यवहार वाढत असून, रोख रकमेचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे. एटीएममधून काढण्यात येणाऱ्या रकमेत मागील पाच वर्षांत वाढ झाली आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. चलनी नोटांच्या वापरात जगात चीननंतर भारताचाच क्रमांक लागतो. मात्र, एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत काढण्यात येणाऱ्या रोख रकमेचे प्रमाण भारतात 17 टक्‍क्‍यांवर स्थिर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com