सरकार, कर्जदात्यांची देणी चुकती

Tata-Teleservices
Tata-Teleservices

नवी दिल्ली - टाटा समूहाने सरकार आणि कर्जदात्यांची सुमारे ५० हजार कोटी रुपयांची देणी चुकती करून आपल्या मोबाईल व्यवसायाची विक्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. टाटा समूहाने टाटा टेलिसर्व्हिसेस लि.चा व्यवसायाचे सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय ऑक्‍टोबर २०१७ मध्ये घेतला होता. 

गेल्या महिन्यात दूरसंचार विभागाला देय असलेले १० हजार कोटी अदा केल्यानंतर टाटा टेलिसर्व्हिसेवर असलेल्या ४० हजार कोटी रुपये थकीत कर्जाचाही भरणा टाटा समूहाकडून करण्यात आला आहे, अशी माहिती टाटा सन्स लिमिटेडने दिली.

दरम्यान, टाटा टेलिसर्व्हिसेसवरील सर्व थकित कर्जांची परतफेड करण्यात आल्यामुळे भारती एअरटेलसोबतचा करार आता पूर्णत्वास गेला आहे. या करारानुसार, १ जुलैपासून टाटा टेलिसर्व्हिसेस आता भारती एअरटेल व भारती हेक्‍साचा (एअरटेल) भाग बनली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com