‘व्होडाफोन-आयडिया’मधील ३५.८ टक्के समभाग विकत घेण्याची सरकारने तयारी सुरू केली आहे.
मुंबई - ‘व्होडाफोन-आयडिया’ (Vodafone-Idea) कंपनी चालविण्याची सरकारची इच्छा नाही. आजवरच्या सरकारच्या आमच्याशी झालेल्या संवादातून त्यांनी हे संकेत दिले आहेत, असे मत ‘व्होडाफोन-आयडिया’चे व्यवस्थापकीय संचालक रविंदर ठक्कर (Ravindra Thakkar) यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
‘व्होडाफोन-आयडिया’मधील ३५.८ टक्के समभाग विकत घेण्याची सरकारने तयारी सुरू केली आहे. कंपनीतील सर्वाधिक समभाग सरकार विकत घेणार आहे. ‘व्होडाफोन-आयडिया’ने स्पेक्ट्रम लिलाव हप्त्यांची थकबाकी आणि ‘एजीआर’चा भरणा करण्याच्या बदल्यात कंपनीच्या समभागांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकार आणि आमच्यात झालेल्या चर्चेचं फलित ‘पॅकेज’ हेच आहे. सरकारने पॅकेज जाहीर केल्यानंतर हे सिद्ध होतंय, की कंपनी चालवायचा सरकारचा विचार नाही. त्यांना बाजारात तीन खासगी कंपन्या हव्या आहेत. त्यांना दोन वा एकाचीच सत्ता नकोय, असे ठक्कर म्हणाले.
मात्र कंपनी समूह ‘व्होडाफोन-आयडिया’चे व्यवस्थापन आणि संचालन करण्यासाठी तयार असल्याचेही ठक्कर यांनी या वेळी स्पष्ट केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.