RBI च्या नव्या 2 योजनांचा सामान्य नागरिकांना 'असा' होणार फायदा

RBI
RBIesakal

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) दोन नव्या योजनांचा शुभारंभ केला. या RBI रिटेल डायरेक्ट योजना आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना आहेत. पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण केलेल्या दोन नव्या योजनांचा गुंतवणूकदार आणि सामान्य नागरिकांना काय फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर...

नव्या योजनांचा गुंतवणूकदार आणि सामान्य नागरिकांना 'असा' होणार फायदा

-RBI रिटेल डायरेक्ट स्कीम अंतर्गत किरकोळ गुंतवणूकदार सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करू शकतील.

-भारत सरकार आणि राज्य सरकारांनी जारी केलेल्या सिक्युरिटीजमध्ये थेट गुंतवणूक करण्याचा एक नवीन मार्ग मिळेल.

-या योजनेंतर्गत गुंतवणूकदार आरबीआयकडे सरकारी सिक्युरिटीज खाते ऑनलाइन मोफत उघडू शकतात.

-तर रिझर्व्ह बँक-एकात्मिक लोकपाल योजनेचा उद्देश आरबीआयद्वारे नियंत्रित केलेल्या संस्थांविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक चांगली प्रणाली प्रदान करणे हा असेल.

-ही योजना वन नेशन-वन ओम्बड्समनवर आधारित आहे.

-यामध्ये ग्राहकांना तक्रारी करण्यासाठी एक पोर्टल, एक ईमेल आणि एक पत्ता अशी सुविधा देण्यात आली आहे.

-तक्रारींना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी, कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि अभिप्राय देण्यासाठी जागा मिळेल.

RBI
एसटी संपाचे स्टेटस ठेवले, ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

छोट्या गुंतवणूकदारांना खास गिफ्ट

-किरकोळ गुंतवणूकदार त्यांचे गिल्ड सिक्युरिटीज खाते (रिटेल डायरेक्ट) RBI कडे देखील उघडू शकतात.

-रिझर्व्ह बँकेच्या रिटेल डायरेक्ट योजनेमुळे आता सामान्य गुंतवणूकदारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सिक्युरिटीजमध्ये थेट गुंतवणूक करता येईल.

-रिटेल डायरेक्ट योजनेचे अकाऊंट विनामूल्य उघडता येईल.

-RBI रिटेल डायरेक्ट योजना यावर्षी फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आली होती.

-किरकोळ गुंतवणूकदारांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सरकारी सिक्युरिटीज मार्केटमध्ये – प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही – सुलभ प्रवेश प्रदान करणे हा उद्देश आहे.

RBI
'जय श्रीराम' म्हणणारे संत नसून 'राक्षस'? काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

एकात्मिक लोकपाल योजनेचा असा होणार फायदा...

पीएमओने सांगितले की, “एकात्मिक लोकपाल योजनेची मध्यवर्ती संकल्पना ‘एक राष्ट्र-एक लोकपाल’ या संकल्पनेवर आधारित आहे. या अंतर्गत एक पोर्टल, एक ई-मेल आणि एक पत्ता असेल जेथे ग्राहक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. ग्राहक त्यांच्या तक्रारी सबमिट करू शकतात, कागदपत्रे सबमिट करू शकतात, त्यांच्या तक्रारी/कागदपत्रांच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात आणि अभिप्राय देऊ शकतात. यासाठी एक बहुभाषिक टोल फ्री क्रमांक देखील दिला जाईल, ज्यावर तक्रारींचे निवारण आणि तक्रारी दाखल करण्याबाबत आवश्यक ती सर्व माहिती दिली जाईल. एकात्मिक लोकपाल योजनेचा उद्देश तक्रार निवारण प्रणालीमध्ये आणखी सुधारणा करणे हा आहे. जेणेकरून भारतीय रिझर्व्ह बँक संस्थांविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नियम तयार करू शकेल.

लोकपाल योजनेमुळे तक्रारी करण्यासाठी नवे व्यासपीठ

कोरोना काळात RBIची भूमिका महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. सामान्य लोकांच्या सुविधा वाढवण्यासाठी, RBI ने त्यांना लक्षात घेऊन सतत अनेक पावले उचलली आहेत. या नव्या योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीची व्याप्ती वाढवली जाईल. भांडवली बाजारातील प्रवेश अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल. यामुळे सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा एक सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला आहे. तर लोकपाल योजनेमुळे तक्रारी करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com