खासगी बॅंकांतून ठेवी न काढण्याचे रिझर्व्ह बॅंकेचे राज्य सरकारांना आवाहन

rbi
rbi

मुंबई - राज्य सरकारांनी त्यांच्या ठेवी खासगी क्षेत्रातील बॅंकांमधून काढून घेऊ नयेत किंवा इतरत्र वळवू नयेत. खासगी क्षेत्रातील बॅंकांमधील त्यांचा पैसा सुरक्षित आहे, अशी ग्वाही रिझर्व्ह बॅंकेने राज्य सरकारांना दिली आहे.

रिझर्व्ह बॅंकेने देशातील सर्व राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. खासगी क्षेत्रातील बॅंकांमधून पैसा काढून घेतल्याने देशातील बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रावर विपरित परिणाम होऊ शकतो, असे त्यात म्हटले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या येस बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातल्यानंतर काही राज्य सरकारांनी आपल्या विभागांना खासगी बॅंकांमधील ठेवी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांकडे वळवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे वृत्त समोर आले होते. ‘राज्य सरकारांच्या या पावलामुळे देशातील बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या स्थैर्यावर विपरित परिणाम होईल. तसेच खासगी बॅंकांमधील पैशाच्या सुरक्षिततेसंदर्भात चुकीची धारणा निर्माण होते आहे. हे सर्व वित्तीय क्षेत्र आणि बॅंकिंग क्षेत्राच्या हिताला बाधा आणणारे ठरेल असे आम्हाला वाटते’, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

ज्या राज्य सरकारांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल किंवा जर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असेल त्यांनी त्याचा फेरविचार करावा. खासगी बॅंकांमधील त्यांच्या ठेवी सुरक्षित आहेत, असेही रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com