

विजय नाईक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार पहिल्यांदा 2014 व नंतर 2019 मध्ये केंद्रात आले, तेव्हापासून मोदी यांच्या नेतृत्वाची छाप असलेले रस्ते, अयतिहासिक स्थळे, बाजारपेठा, नगरे व महानगरे यांची नावं बदलण्याचा सपाटा चालू आहे. नावं बदलली की इतिहास बदलेल, असे भाजपला वाटते. प्रत्यक्षात इतिहास बदलत नाही, बदलते ते फक्त टपाल खात्याच्या नोंदीतील नाव. वर्षानुवर्षे नागरिकांना जी नावे ठाऊक असतात, त्यांचं नामांतर झालं, तरी नागरीक आपल्या ओळखीच्या नावानंच त्याला संबोधित करतात.