

अलीकडे लिहिलेल्या एका ब्लॉग मध्ये मी ``शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’’ हे अयतिहासिक समीकरण असल्याचे मी म्हटले होते. एकेकाळी जगाचा व भारताचा शत्रू असलेला तालिबान आता पाकिस्तानचा शत्रू झाल्याने आपला मित्र होऊ पाहात आहे.
भारताची फाळणी झाल्यापासून पाकिस्तान आपला कायमचा शत्रू बनला आहे. सध्या पाकिस्तान व तालिबान यांच्या अफगाणिस्तान सीमेवर जोरदार चकमकी सुरू आहेत, त्या ही अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी भारताच्या दौऱ्यावर असताना. या चकमकीत तालिबानने पाकिस्तानच्या काही चौक्या ताब्यात घेतल्या व 54 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. याचे युद्धात रूपांतर होईल काय व तसे झाल्यास सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मदतीला येणार काय, या प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळतील.