मुंबई Coronavirus : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी राज्यातील जनतेनं सुरक्षित राहण्यासाठी घरातून बाहेर पडू नये, असं आवाहन केलं. तसचं राज्यावर हे गंभीर संकट ओढवलं असलं तरी सरकार खंबीर असल्याचं सांगत त्यांनी जनतेला दिलासा दिला आहे. आता केवळ गरज आहे ती, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचं पालन करण्याची.
मुंबई पोलिसांनी काही लाख मास्क छापा टाकून पकडले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदत करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचा आपल्याकडे पुरेसा साठा आहे. मी आजच अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानाही सुचना दिल्या आहेत. अजिबात काळजी करू नका. या अशा परिस्थितीत स्वयंसेवी संस्था, मंदिरे मदतीसाठी पुढे आले आहेत. लालबागच्या राजाने रक्तदान शिबिरे सुरु केले आहे. तर शिर्डी, सिद्धीविनायक यांनी देखील आपापल्या परीने मदतीची तयारी दाखविली आहे. मदत करणाऱ्या संस्थाना कुठेही अडचण येऊ नये, अशा सूचना मी दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडथळा येऊ नये, अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. हा महत्वाचा टप्पा आपण सर्वांच्या सहकार्याने पार पाडू या. संकट गंभीर आहे, पण सरकार खंबीर आहे.'
कोरोनाशी संबंधित अपडेट्स वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
काय म्हणाले मुख्यमंत्री?
कोरोनाशी संबंधित अपडेट्स वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यात कोठे किती रुग्ण?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.