
पुणे - कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, आता परदेशवारी करणाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचीही चाचणी घेण्यात येणार आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्यावतीने (आयसीएमआर) शुक्रवारी (ता. २०) कोरोना चाचणी संदर्भातील धोरणात बदल करण्यात आला आहे. यानुसार १४ दिवस ‘होम क्वारंटाइन’मध्ये असलेले नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय ज्यांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली आहेत, अशा नागरिकांच्या घशातील द्रवपदार्थाची चाचणी घेण्यात येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरातील १८२ देश ‘कोविड- १९’ या विषाणूंमुळे प्रभावित झाले आहेत. देशातील कोरोना विषाणू प्रसाराचा पहिला टप्पा आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांमुळे सुरू झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळच्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे दुसऱ्या टप्प्याला देशात सुरुवात झाली. दिवसेंदिवस कोरानाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. याचा विचार करता ‘आयसीएमआर’च्यावतीने चाचणीसंदर्भातील धोरणांमध्ये बदल करत संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास किंवा तिसऱ्या टप्प्याची चाहूल वाटल्यास या धोरणात आवश्यक बदल करण्यात येईल असे कोरोनाविरुद्धच्या राष्ट्रीय कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. या आधीही ९ आणि १६ मार्चला असे बदल करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.