पूर्वजांचे ‘रेकॉर्ड’ जपुन ठेवणारा भाट

पूर्वजांच्या नोंदी लेखी स्वरूपात ठेवणे हा भाटांचा पिढीजात व्यवसाय
Bhat
BhatSakal

'भाट' हा शब्द मराठीत 'स्तुतिपाठक' या अर्थाने प्रचलित आहे. हा एक भटका समाज असून 'भाट' किंवा 'पुस्तके' या नावानं तो महाराष्ट्रभर ओळखला जातो. पूर्वजांच्या किंवा आपल्या मालकाच्या वंशावळी, त्या संदर्भातील इतर नोंदी लेखी स्वरूपात ठेवणे हा भाटांचा पिढीजात व्यवसाय आहे. भाटांमध्ये जातीचे विभाजन आढळते. जुन्या काळापासुन भाट ही जात प्रचलित आहे असा दाखला इतिहास देते. काही राजाच्या ताम्रपटात भाटांचा उल्लेख दिसुन येतो.

भाटांकडे नेमक्या कोणत्या गोष्टीच्या नोंदी असतात अन त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत?

आपले पूर्वज कोण होते? त्यांचे मूळ गाव, त्यांचं नाव, जात-पोटजात, पूर्वज कोठे राहत होते? कुलदैवत कोणते? अगदी खापर पणजोबा काय करायचे, तुमचे कुटुंब मुळचे कुठले? परिवार या गावात कसा आला? या सगळया रंजक माहितीचा इतिहास या 'पुस्तक्यांकडे' सापडतो. ही माहिती इतकी सविस्तर लिहलेली असते की अशी माहिती शासनाच्या कोतवाल बुकातही आपल्याला सापडणार नाही. भाट लोक अडीच वर्षातुन एकदा एखादा गावात एक- दोन महिने वास्तव करण्यासाठी जातात. मग ते गावातील घर अन् घर पिंजुन काढतात. भाट जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा ते वंशावळ वाचण्याच्याआधी श्रीगणेश व इतर देवतांना वंदन करून वाचायला सुरुवात करतात. नंतर ते एका विशिष्ट सुराता आपल्या खाबरपंजोबा,पंजोबा, आजोबा या वंशावळीची नावे वाचून दाखवतात. मग नंतर घरातील जेष्ठ मंडळीना विचारपुस करतात घरात नविन सुन लग्न करुन आली का? तुमच्या घरात लहान मुलं जन्माला आले का? जर आले तर तर नवीन पिढीतील सुनांची मुलांची नावे याची नोंद करुन घेतात.

ही नोंद करायचे ते वेगवेगळ्या स्वरूपात मोबदला घेतातं कुणी त्यांना धातुची भांडे देतात तर कुणी धान्य देतात.सोबत काही दिलदार लोक पैसेही देतात. जुण्या भाटांच्या दप्तरात 'सांकेतिक' लिपीत लिहिलेला बहुतेकांचा लेखाजोखा आजही उपलब्ध आहे. त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय इतर कुणीही करू नये, म्हणून सांकेतिक लिपीत नोंदी करण्याची त्यांची पध्दत असावी असा अंदाज बांधला जातो. मराठी सिनेमात पहिल्यांदा भाटांची भुमिका 'भारतीय’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी केली. यामुळे वंशावळीचा इतिहास सांगणारे भाट लोक प्रक्षेकांसमोर आले.आणि नवीन पिढी भाट समजण्यास थोडा हातभार लागला.

मी माझ्या लहानपणी आमच्या गावात भाट आले होते .तेव्हा त्यांना बघितलं होत तर एकटांगी धोरत नेसलेला एक रुबाबदार व्यक्तीमहत्व ,डोक्यावर लाल पटकां बांधलेला,हातात एक काठी आणि खांद्यावर एक कापडी पिवशी असणारा,मधुर वाणी आणि अचूक शब्दफेक करतारा भाट मला आजही आठवतो. गावातील जुनी खोडं म्हणजेच म्हातारी आजी आजोबा सांगतात की पूर्वी भाट वंशावळींची नोंद असलेले ताम्रपट घेऊन फिरत असत.

गावांची लोकसंख्या वाढली आणि ताम्रपटांचे ओझे घेऊन फिरणे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे हेळवी वंशावळींतील नोंद कापडी शिवणीच्या कागदांच्या चोपड्यांमध्ये ठेवू लागले. परंतु कागद लवकर जीर्ण होऊ लागताच त्यांच्या नक्कला नव्या चोपड्यावर करून ठेवतात. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांनी त्यांचे ताम्रपट एकत्रितपणे बेळगावला ठेवले आहेत असे सांगितले जाते. त्या ताम्रपटांची देखरेख करणाऱ्यांना गुरू म्हणतात. आजच्या डिजिटल जमान्यात भाटांची संख्या फार कमी झाली आहे.खुप कमी लोक आपल्या पूर्वजांचा हा वसा समोर नेतं आहेत.त्याला असंख्य कारणे आहेत. तुम्हाला ही भाटांची गोष्ट कशी वाटली नक्की सांगा अन जर तुमच्या घरी असा भाट आला असेल तर तो अनुभव आमच्या सोबत शेअर करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com