Diwali 2022 : दिवाळीत सगळीकडे दिवे का लावले जातात? जाणून घ्या धार्मिक कारण

दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण
Diwali 2022 : दिवाळीत सगळीकडे दिवे का लावले जातात? जाणून घ्या धार्मिक कारण

दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे. हा उत्सव धनत्रयोदशीच्या म्हणजेच कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीला सुरू होतो आणि अमावास्येपर्यंत साजरा केला जातो. संध्याकाळ झाली की घरात आई आपल्याला सांगत असे की चल आता दारापुढे, तुळशीपुढे, खिडक्यांमध्ये, सगळीकडे दिवा लाव. घरात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या हे तीन दिवस सतत दिवे लावले जातात शिवाय अनेक ठिकाणी अखंड दिवा देखील लावला जातो.

Diwali 2022 : दिवाळीत सगळीकडे दिवे का लावले जातात? जाणून घ्या धार्मिक कारण
Diwali Festival 2022 : दिवाळी फराळातून बचतगटांना रोजगाराची संधी!

दीपोत्सव हा भगवान विष्णूच्या गृहस्वरूपाचा उत्सव आहे. या सणात श्री गणेशाची पूजा केली नाही तर लक्ष्मी देवीही टिकत नाही. त्यामुळे दोघांची पूजा आवश्यक आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात यमदिपदान केल्याने मृत्यूचे भय दूर होते. हिंदू धर्मात, प्रकाशाची नेहमी सूर्य आणि अग्नीच्या रूपात पूजा केली जाते.

Diwali 2022 : दिवाळीत सगळीकडे दिवे का लावले जातात? जाणून घ्या धार्मिक कारण
Diwali 2022: येत्या दिवाळीला रात्री करा दक्षिणावर्ती शंखाची पूजा अन् घालवा आर्थिक अडचणी

सर्व प्राण्यांना प्रकाश आणि जीवन देण्यासाठी सूर्याची उत्पत्ती देवाच्या दक्षिण नेत्रातून झाली असे म्हटले जाते. प्रत्येक पंथात प्रकाश आणि प्रकाशाचे स्वतःचे महत्त्व आहे. लंका जिंकून भगवान राम अयोध्येला परत आले, तो दिवस कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या होता. सर्व अयोध्यावासीयांनी दीप प्रज्वलन करून त्यांचे स्वागत केले. या दिवसापासून दिवाळीला दिवा लावण्याची परंपरा सुरू आहे.

Diwali 2022 : दिवाळीत सगळीकडे दिवे का लावले जातात? जाणून घ्या धार्मिक कारण
Diwali 2022 : दोस्तांना दिवाळीसाठी सोन पापडी gift करावं की मिम्स ? वाचा

दिवा आणि त्याची ज्योत जीवनासारखी तेजस्वी आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी, जल आणि वायू या पाचही तत्वांपासून दिवा तयार होतो आणि प्रकाशित होतो. दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होते. मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने वातावरणातील विषारी जंतू नष्ट होतात.कुटुंबातील दारिद्र्य दूर करण्यासाठी धनत्रयोदशीच्या संध्याकाळपासून दीपावलीच्या रात्रीपर्यंत अखंड दिवा लावणे फायदेशीर मानले जाते. धनत्रयोदशीपासून भाऊबिजेपर्यंत घरात अखंड दिवा लावल्याने घरातले पंच महाभूत संतुलित राहतात आणि त्याचा प्रभाव वर्षभर माणसाच्या आयुष्यावर राहतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com