Krishna Janmashtami: श्रीकृष्णाने खरंच आपल्या सोळा हजार राण्यांशी लग्न का केले होते?

भगवान श्रीकृष्णाची जयंती यावर्षी 18 ऑगस्ट रोजी आहे.
Krishna janmashtami 2022
Krishna janmashtami 2022Esakal

कृष्ण जन्माष्टमी 2022: भगवान श्रीकृष्णाची जयंती यावर्षी 18 ऑगस्ट रोजी आहे. त्यामुुळे भगवान श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या आख्यायिकांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आज आपण त्यांच्या सोळा हजार पत्नींबद्दल असलेल्या आख्यायिकेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे अलौकिक प्रेम सर्वज्ञात आहे. जरी राधा आणि श्रीकृष्णाचे लग्न होऊ शकले नाही.तरी लोक आजही त्याच्या पवित्र प्रेमाची उदाहरणे देतात.भगवान श्रीकृष्णाबद्दल असे म्हटले जाते की त्यांना सोळा हजार एकशे आठ बायका आणि दीड लाखाहून अधिक पुत्र होते.

श्रीकृष्णाने एकाच वेळी 16 हजार मुलींची लग्ने केली होती. पण त्याने असे का केले, यामागचे कारण फार कमी लोकांना माहीत आहे. चला जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णाने सोळा हजार बायका का केल्या होत्या आणि त्यांना एकूण किती मुले झाले होती?

पौराणिक मान्यतेनुसार नरकासुर नावाच्या राक्षसाने इंद्र, वरुण, अग्नि, वायू इत्यादी सर्व देवांना त्रास दिला होता. तो साधू संतांनाही त्रास देऊ लागला होता.असे म्हणतात की त्याने अनेक राज्यांच्या राजकन्या आणि संत स्त्रियांना कैद केले होते. जेव्हा नरकासुराचा अत्याचार खूप वाढला तेव्हा देवता आणि ऋषी हे सुरक्षित राहण्यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या आश्रयाला गेले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना नरकासुरापासून मुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन दिले, परंतु या नरकासुरराक्षसाला शाप मिळाला की तो स्त्रीच्या हातून मरेल. म्हणूनच या कपटी राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिला आपल्या सोबत सारथी म्हणून नेऊन तिला या राक्षसाचा वध करायला लावला आणि त्यांच्या कैदेत असलेल्या सर्व मुलींना मुक्त केले.

Krishna janmashtami 2022
Krishna janmashtami 2022: यंदा कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी?

कैदेतून सुटल्यानंतर या मुलीपैकी 16 मुली आपल्या घरी जाण्यास तयार नव्हत्या. त्या श्रीकृष्णाला सांगू लागल्या की तुम्ही आम्हाला मुक्त केले, पण आता आम्ही कुठे जाणार, कारण या राक्षसाने आमच्या कुटुंबातील सदस्यांना यापूर्वी मारून टाकले आहे.आम्हाला राहायला घरदार नाही. काही मुलींचे नातेवाईक जिवंत होते, मात्र त्या मुलीचे चारित्र्यहरण झालेले असु शकते अशा अफवे खाली मुलींना घरी परत घेण्यास नकार देत होते, असे सांगितले जाते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने या सर्व मुलींचे हाल ऐकून त्या सगळ्यासोबत एकत्र लग्न केले. यादरम्यान देवाने एकाच वेळी 16 हजार रूपे ठेवली होती.

कृष्णाला 1 लाख 61 हजार पुत्र होते..

पौराणिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाला 1 लाख 61 हजार पुत्र होते. असे म्हटले जाते की त्यांच्या सर्व पत्नींना प्रत्येकी 10 मुलगे आणि एक मुलगी होती. अशा प्रकारे त्यांना 1 लाख 61 हजार 80 मुलगे आणि 16 हजार 108 मुली झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com