Pitru Paksha : पितृ पक्षात श्राध्द करण्याचा महाभारताशी संबंध

पितृ पक्षात तर्पण केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि घरात सुख-शांती राहते.
Pitru Paksha
Pitru Pakshaesakal

Pitru Paksha : भाद्रपदाच्या पौर्णिमेपासून ते आमावस्येपर्यंत पितृ पक्ष असतो. याकाळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विधी पूर्वक श्राध्द केले जाते. पितृ पक्षात केल्या जाणाऱ्या तर्पणामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि घरात सुख-शांती मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का, पितृ पक्षाची सुरूवात कशी झाली होती? तर ही परंपरा महाभारत काळापासून चालत आली आहे. श्राध्दाविषयी भीष्म पितामह यांनी युधिष्ठिराला सांगितले हाते. याची कहाणी जाणून घेऊया,

Pitru Paksha
Pitru Paksha 2022: पितृ पक्षाचा संपूर्ण पंधरवाडा कोणते शुभ काम करू नका: फक्त मनोभावे पितृ पक्ष साजरा करा

पितृ पक्षाचा महाभारताशी संबंध

गरूड पुराणात भीष्म आणि युधिष्ठीर यांच्यातला संवाद आहे. महाभारतात भीष्मांनी युधिष्ठिराला श्राध्द आणि त्याचे महत्व सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, अत्री ऋषींनी सर्वात पहिले महर्षि निमि यांना श्राध्दाचे ज्ञान दिले. आपल्या मुलाच्या अकस्मित मृत्यू झाल्याने दुःखी होऊन निमि ऋषींनी आपल्या पूर्वजांना आवाहन केले. त्यानंतर त्यांचे पित्र प्रकट झाले व त्यांनी सांगितले की, तुमचा मुलगा आधीच पितृ देवांमध्ये पोहचला आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या आत्म्याला जेऊ घालणे, पूजा करणे असे काम केले आहे. हे पितृ यज्ञ करण्यासारखेच आहे. तेव्हापासून श्राध्द हे सनातन धर्माचे महत्वपूर्ण कार्य सामजले गेले आहे.

Pitru Paksha
Pitru Paksha : पितृ दोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

त्यानंतर महर्षि निमि व इतर ऋषींनी श्राध्द करणे सुरू केले. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की, महाभारतीचे युध्द झाल्यानंतर युधिष्ठिराने सर्व मृत सैनिकांचे अंत्य संस्कार आणि श्राध्द केले होते.

Pitru Paksha
Pitru Paksha 2022: पितृ पक्षाचा संपूर्ण पंधरवाडा कोणते शुभ काम करू नका: फक्त मनोभावे पितृ पक्ष साजरा करा

इंद्राशी संबंध

कर्णाचा मृत्यू झाल्यावर जेंव्हा तो स्वर्गात पोहचला तेंव्हा त्याला खायला सोने दिले गेले. तेंव्हा त्याने इंद्राला विचारले की, तुम्ही मला खायला सोनेच का देत आहात. त्यावर इंद्र म्हणाले तुम्ही कायम सोन्याचे दान केले. कधी पितरांना खाऊ घातले नाही. त्यानंतर पितृ पक्ष सुरू झाले. कर्णाला परत पृथ्वीवर पाठवण्यात आले. मग त्याने श्राध्द, पिंडदान आणि तर्पण करून पूर्वजांना खूश केले व परत स्वर्गात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com