Vivah Panchami: मार्गशीष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथिला विवाह पंचमी साजरी केली जाते. या वेळी पंचमी २८ नोव्हेंबर या दिवशी असणार आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान राम आणि सितेचं लग्न झालं होतं. त्यामुळे या दिवशी तर सगळी चांगली काम व्हायला हवी असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र हा दिवस याऊलट आहे. ही तिथी लग्नासाठी अशुभ मानली जाते. ही तिथी अशुभ का असते ते जाणून घेऊया.
पौराणिक मान्यतेनुसार, मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथिला राम आणि सितेचा विवाह पार पडला होता. त्यामुळे या दिवसाला विवाह पंचमी अशी मान्यता मिळाली. हा दिवस लोक राम आणि सितेच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी लोक घरात भगवान राम आणि सितेची विधी विधानानुसार पूजा करतात.
या दिवशी लोक लग्न का करत नाही?
हिंदू धर्मात राम आणि सितेच्या जोडीला आदर्श पती-पत्नी मानलं जातं. लोक त्यांच्या आदर्शाचं उदाहरण त्यांचे विचार मानतात. लोक नवविवाहित जोडप्यांना राम सीतेच्या जोडीसारखा संसार थाटण्याचा आशीर्वादही देतात. मात्र तरीदेखील या दिवशी लोक लग्न करायला का घाबरतात?
जाणून घ्या कारण?
या दिवशी लोक लग्न न करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे राम सितेला मिळालेला वनवास. असे मानले जाते की याच तिथिला त्यांच्या विवाहानंतर १४ वर्षापर्यंतचा वनवास भोगावा लागला होता. त्यांना फार संघर्ष करावा लागला होता. रावणाच्या वधानंतर परल्यानंतरही रामाला सितेचा त्याग करावा लागला. याच कारणाने या दिवशी लोक लग्न करण्यास घाबरतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.