Nehru, Mountbatten & Astrology
esakal
१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारतीयांच्या इतिहासातील सर्वात अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. अगदी मध्यरात्री हा सोहळा पार पडला. याचवेळी पंडित नेहरूंनी त्यांचं ऐतिहासिक भाषणही केलं. पण हा सोहळा नेमका मध्यरात्रीच का पार पडला? यामागे काय कारण होतं? याची कहाणी राजकारणाइतकीच रंजक आहे. माउंटबॅटन यांनी निवडलेली तारीख, त्या तारखेला ज्योतिषांनी केलेला विरोध आणि अखेर ठरवण्यात आलेला मध्यरात्रीचा मुहूर्त, असा हा सगळा घटनाक्रम होता.