नवी दिल्ली - तालिबान्यांनी (Taliban) कब्जा केल्यानंतर तेथील नागरिकांना (Citizens) भारताने (India) आश्रय देऊ केला आहे. त्यानुसार आजही ३९२ नागरिकांना तीन वेगवेगळ्या विमानांद्वारे (Plane) भारतात (India) आणण्यात आले. त्यात अफगाणिस्तानातील शीख खासदारही होते. माध्यमांशी बोलताना त्यांना तर अश्रू अनावर झाले.
अफगाणिस्तानमधील भारतीय नागरिकांसह आश्रय मागतील त्यांना परत सुखरूप आणण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे. त्यानुसार पहिल्या विमानाद्वारे आज १६८ जणांना भारताच्या भूमीत आणण्यात आले. यात १०७ भारतीय, २३ अफगाणी शीख आणि हिंदू यांचा समावेश होता. अफगाण नागरिकांमध्ये काही जण मुलाबाळांसह भारतात आश्रयाला आल्याचे दिसत होते. अफगाणिस्तानचे खासदार नरेंद्र सिंग खालसा यांनाही भारतात आणण्यात आले आहे. या सर्वांना ‘सी-१७’ या हवाई दलाच्या विमानाद्वारे हिंडन विमानतळावर उतरविण्यात आले.
एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाद्वारे ८७ भारतीय आणि दोन नेपाळी नागरिकांना दुशांबेहून आणण्यात आले. या सर्वांना काल काबूलहून ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे नेण्यात आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी एका विमानाद्वारे १३५ नागरिकांना भारतात आणण्यात आले. त्यांना गेल्या दोन-तीन दिवसांत काबूलहून कतारची राजधानी दोहा येथे अमेरिका आणि ‘नाटो’च्या विमानांद्वारे नेण्यात आले होते. तेथून आता त्यांना विशेष विमानाने दिल्लीला आणण्यात आले.
पाच दिवसांत दोन हजार दूरध्वनी
भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मदतीसाठी स्थापन केलेल्या अफगाण विशेष कक्षाला पाच दिवसांत दोन हजार दूरध्वनी आले आहेत. आतापर्यंत व्हॉट्सॲपवर सहा हजार जणांना प्रश्नांची उत्तरे देण्यात आली, शंकानिरसन करण्यात आले. सुमारे बाराशे ‘ई-मेल’ना उत्तरे देण्यात आली आहेत. अफगाणिस्तानातील भारतीय आणि अन्य नागरिकांच्या समन्वयासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.