‘जल जीवन मिशन’मध्ये काश्‍मीरची आघाडी

मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी देशातील प्रत्येक घरात नळाचे पाणी देण्याची योजना जाहीर केली होती.
‘जल जीवन मिशन’मध्ये काश्‍मीरची आघाडी

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू काश्‍मीरमधील (jammu kashmir) कोणतीही शाळा आणि अंगणवाडी आता स्वच्छ पाण्याच्या सुविधेपासून वंचित राहणार नाही. काश्‍मीर प्रदेशातील प्रत्येक सरकारी शाळेत आणि अंगणवाडी केंद्रात नळाचे पाणी पुरवण्याची योजना पूर्णत्वास आली आहे. प्रत्येक शाळेत नळाचे पाणी उपलब्ध करणारा जम्मू काश्‍मीर (jammu kashmir) हा देशातील पहिला प्रदेश ठरला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली.

जलशक्ती मंत्रालयाने सर्व सरकारी शाळा आणि अंगणवाडी केंद्रात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार २ ऑक्टोबर २०२० रोजी शंभर दिवसाचे अभियान देशभरात सुरू केले होते. तत्पूर्वी मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी देशातील प्रत्येक घरात नळाचे पाणी देण्याची योजना जाहीर केली होती. यानुसार १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत प्रत्येक शाळा आणि अंगणवाडी केंद्रात नळाचे पाणी उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यानुसार जम्मू काश्‍मीरमध्ये २३,९२६ अंगणवाडी केंद्र आणि ग्रामीण भागात २२,४२२ सरकारी शाळेत नळाद्वारे पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट्य साध्य करण्यात आले आहे.

‘जल जीवन मिशन’मध्ये काश्‍मीरची आघाडी
...म्हणून 'CAA' आवश्यक होता; केंद्रीय मंत्र्याचं अफगाणिस्तानच्या स्थितीवर भाष्य

यापूर्वीच्या सरकारांनी अनेक दशकांपर्यंत जम्मू काश्‍मीरच्या नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले. त्यांनी केवळ आपल्याच कुटुंबाची चिंता केली. मोदी यांनी विकासाचे नवीन पर्व सुरू करून गरीब लोकांना मुख्य प्रवाहात आणले आहे. जम्मू काश्‍मीरच्या सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रात नळाद्वारे स्वच्छ पाणी देण्याची योजना वेळेपूर्वीच अंमलात आल्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन करतो.

- अमित शहा, गृहमंत्री

‘जल जीवन मिशन’मध्ये काश्‍मीरची आघाडी
रहाणे किंवा पुजाराच्या जागी 'या' खेळाडूला संधी द्या- इंजिनियर

जम्मू काश्‍मीरचे ‘मिशन विकास’

  • चार जिल्ह्यात नळाद्वारे पाणी देण्याचे शंभर टक्के ध्येय पूर्ण

  • आठ जिल्ह्यांत योजनेचे काम ९० टक्के पूर्ण

  • जम्मू काश्‍मीर प्रदेशातील केवळ दोन जिल्ह्यातील काम ८० टक्कयांपेक्षा कमी

  • सहा जिल्ह्यांत जल जीवन मिशनचे ८० ते ९० टक्के काम पूर्ण

  • जम्मू काश्‍मीरच्या ग्रामीण भागात १८.१६ लाख घर

  • दहा लाख घरांत ३१ मार्चपर्यंत नळाद्वारे पाणी पोचले

  • चालू आर्थिक वर्षात ४.९ लाख घरात नळाद्वारे पाणी देण्याचे प्रयत्न

  • जुलैपर्यंत ग्रामीण भागात २०,२४५ सरकारी शाळांत नळाचे पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com