उत्तर प्रदेशात पावसासह वादळवाऱ्यामुळे 43 जणांचा मृत्यू; पुढील 24 तास सतर्कतेचे

thunderstorm
thunderstorm

लखनऊ - उत्तर भारताला 30 मे रोजी जोरदार पावसाने झोडपले आहे. या दरम्यान उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या घटनांमध्ये 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. युपी सरकारकने याबाबतची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. तसेच या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवाय जखमी झालेल्यांवर सरकारकडून उपचार करण्यात येत आहे.

30 मे रोजी झालेला मुसळधार पाऊस आणि वादळ-वाऱ्यामुळे उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागांमध्ये 43 लोकांचा जीव गेला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. उन्नाव जिल्ह्यात 8 आणि कन्नोजमध्ये 5 लोकांचा जीव गेला आहे. तसेच लखनऊ शहरात घर कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच वेगवेगळ्या भागात 6 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.     

शनिवारी रात्री बहुआ भागात धूळीचे वादळ आले होते. वादळामुळे एक कच्चे घरे पडले आहे. यात एका 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कुसुम्भी गावातही घर पडल्याने एका 60 वर्षीय व्यक्तीचा जीव गेला आहे. घर पडले त्यावेळी हा व्यक्ती घरात झोपला होता, अशी माहिती ललौली पोलिस स्टेशनचे अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील 24 तासात मुसळधार पावसासह वादळाची सूचना रविवारी दिली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 50 ते 60 किलोमीटर प्रति तास असणार असून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com