Heatstroke : बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रकोप! चोवीस तासांत ४४ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरूच असून गेल्या चोवीस तासांत राज्यात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.
heatstroke
HeatstrokeSakal

पाटणा - बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरूच असून गेल्या चोवीस तासांत राज्यात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे राज्यात आतापर्यंत १२७ जणांचा मृत्यू झाला आहे.

उष्णतेच्या लाटेने आजारी पडलेल्या सात जणांचा आज गोपालगंज सदर रुग्णालयात मृत्यू झाला. यापैकी पाच जणांचा उपचारादरम्यान तर अन्य दोघांना दवाखान्यात आणले तेव्हा त्यांना मृत घोषित केले. बक्सरच्या डुमराव येथे जावक केंद्रावर कर्तव्यावर असलेले गृहरक्षक दलाचे जवान सत्येंद्र ठाकूर (वय ५५) यांचा मृत्यू झाला. हाजीपूरच्या गौरोल येथे पत्रकार कुमार मुकेश यांचा मृत्यू झाला.

त्याचवेळी जहानाबाद येथे चार, छपरा येथे तीन, बेगुसराय येथे एक, नालंदा येथे एकाचा मृत्यू झाला. अन्य ठिकाणी रोहतास जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून यापैकी चौघे निवडणूक कर्मचारी होते. कैमुर जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात आठ, गया जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे मुंगेर येथील पोलिस कर्मचारी ददन प्रसाद सिंह यांचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

ओडिशात ३० जणांचा उष्माघाताने मृत्यू?

भुवनेश्‍वर : देशात बहुतेक राज्यांमध्ये उच्चांकी तापमान आहे. ओडिशातही उष्णतेची लाट असून ३० हून अधिक लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हे मृत्यू उष्माघाताने झाले किंवा नाही, याला आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. सुंदरगड, संभलपूर, झारसुगुडा आणि बालनगीर या जिल्ह्यांत उष्णतेमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com