कॅप्टन साहेब शेतकऱ्यांना सुरक्षा द्या; 'आप'ने पंजाबकडे केली मागणी

farmers protest
farmers protest

दिल्ली - दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. गेल्या आठवड्यात प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला. त्यानंतर काही शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली. दरम्यान, राकेश टिकैत यांनी कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे नेत राघव चड्ढा यांनी शनिवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये दिल्लीत सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेची सोय करावी.मोदी सरकारच्या हुकुमशाहीचा आणि भाजपच्या गुंडांचा सामना करत रस्त्यावर न्यायासाठी ते झगडत असल्याचं त्यांनी म्हटलं. राघव यांनी असा आरोप केला की, भाजप शेतकरी आंदोलन दडपून टाकण्यासाठी गुंडांच्या मदतीने सातत्यानं आंदोलकांवर हल्ले करत आहे. शेतकऱ्यांवर दगडफेक करून त्यांना घाबरवलं जात आहे. त्यांनी आंदोलन स्थळावरून पळून जावं म्हणून भीती घातली जात आहे. नुकतंच भाजपचा एक आमदार शेतकऱ्यांना घबरवण्यासाठी आंदोलनस्थळी गेला होता. त्याने शेतकऱ्यांनी भीती घातली आणि धमकीसुद्धा दिली असंही ते म्हणाले. 

शुक्रवारी सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शक्तीचा वापर करून आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी भाजपच्या गुंडांनी दगडफेक केली असाही आरोप राघव यांनी पत्रातून केला आहे. हल्लेखोरांच्या फोटोवरून दिसतं की त्यामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते होते. यात काही असे लोकही होते जे भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या जवळचे आहेत. भाजपच्या नेत्यांसोबत या दंगल घडवणाऱ्यांच्या फोटोंवरून स्पष्ट होतं की, शेतकऱ्यांवर भाजपच हल्ला करत आहे असंही राघव यांनी म्हटलं. 

चड्ढा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, शेतकऱ्यांची सुरक्षा धोक्यात असल्याचं दिसत आहे. दिल्ली पोलिस स्वत: भाजपच्या गुंडांना थोपवण्याचं काम करत आहे. त्यामुळे आता कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पुढे यावं. त्यांनी पंजाबच्या पोलिसांना आदेश द्यावेत आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी अशी विनंती राघव यांनी पत्रातून केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com