

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आयआयटी इंजिनिअर असलेल्या अभय सिंह यांची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, महाकुंभ मेळा सुरू होऊन आठवडा होण्याच्या आधीच अभय सिंह अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. ते प्रयागराज सोडून गेले असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांच्यासोबतच्या संतांनी म्हटलं की, सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांमध्ये बातम्या प्रसारीत झाल्यानंतर लोकांचा त्यांना त्रास व्हायला लागला. ते ज्या उद्देशाने अध्यात्माकडे वळले आणि प्रयागराजला महाकुंभ मेळ्यात आले होते तो उद्देश पूर्ण होत नव्हता. त्यामुळे शेवटी ते प्रयागराज सोडून गेले.