RAW Agents in Pakistan: पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करतोय भारत, पुलवामानंतर अधिक आक्रमक; 'दि गार्डियन'चा दावा

RAW Agents in Pakistan: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 'द गार्डियन' या ब्रिटीश दैनिकाने दिलेल्या वृत्तातील आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत.
RAW Agents in Pakistan
RAW Agents in PakistanEsakal

RAW Agents in Pakistan: पाकिस्तान हे भारताच्या शत्रूंचे आश्रयस्थान आहे, हे कोणापासून लपलेले नाही. मात्र गेल्या काही वर्षांत शेजारी राष्ट्रांमध्ये भारताचे शत्रू एक एक करून संपवले जात आहेत. अशातच 'द गार्डियन' ने एक दावा केला आहे.

अमेरिका, कॅनडा आणि आता ब्रिटनचे दैनिक 'द गार्डियन' (ब्रिटनचे दैनिक द गार्डियन) यांनी भारतविरोधी कारवाई करणाऱ्यांवर परदेशात हत्या आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. 'द गार्डियन'च्या वृत्तानुसार, भारताने इस्राइलची गुप्तचर संस्था मोसाद आणि रशियाच्या केजीबीपासून प्रेरणा घेतली आहे, जे परदेशी भूमीवर शत्रूंना मारण्यासाठी ओळखले जातात असेही म्हटले आहे. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाल फेटाळला आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 'द गार्डियन' या ब्रिटीश दैनिकाने दिलेल्या वृत्तातील आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत, ज्यामध्ये भारतावर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानमध्ये हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने 'द गार्डियन' अहवालातील आरोपांना 'खोटा आणि द्वेषपूर्ण भारतविरोधी केलेला प्रचार' असे म्हटले आहे. निवेदनात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की, इतर देशांमध्ये हत्या करणे हे "भारत सरकारचे धोरण" नाही.

RAW Agents in Pakistan
Bird flu H5N1: कोरोनापेक्षा १०० पटींनी प्राणघातक आहे बर्ड फ्लू; अर्ध्याहून अधिक रुग्णांचा झालाय मृत्यू! नव्या महामारीचा धोका?

गार्डियनच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, नवी दिल्लीने "भारताशी शत्रुत्व असणाऱ्यांना लक्ष्य करण्याचे धोरण राबवले आहे." अहवालात दावा करण्यात आला आहे की, 2019 च्या पुलवामा हल्ल्यापासून भारतीय गुप्तचर एजन्सी RAW ने अशा सुमारे 20 हत्या केल्या आहेत.

हा अहवाल पाकिस्तानने दिलेले पुरावे आणि सीमेच्या दोन्ही बाजूंच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मुलाखतींवर आधारित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गार्डियनने एका अज्ञात भारतीय अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, भारताने इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद आणि रशियाच्या केजीबीपासून प्रेरणा घेतली आहे, जे परदेशी भूमीवर शत्रूंना मारण्यासाठी ओळखले जातात.

RAW Agents in Pakistan
Electoral Bond: इलेक्टोरल बाँडमुळे SBI चा खिसा देखील झाला गरम, सरकारकडून घेतले 10.68 कोटी रुपयांचे कमिशन

या एजन्सींचे नाव 2018 मध्ये सौदी पत्रकार आणि असंतुष्ट जमाल खशोग्गी याच्या हत्येशी देखील जोडले गेले होते. अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी काही हत्येबाबत कागदपत्रे सादर केली आहेत, ज्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकली नाही. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये स्थापन केलेल्या भारतीय गुप्तचरांच्या स्लीपर सेलने ही हत्या केल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे.

याआधी अमेरिका आणि कॅनडाने भारतावर परदेशी भूमीवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मात्र, भारतानेही हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत. कॅनडालाही आरोपांबाबत पुरावे देण्यास सांगितले होते.

RAW Agents in Pakistan
NCERT Political Science Book: बाबरी, गुजरात दंगल ते हिंदुत्वाचं राजकारण.. NCERTच्या पुस्तकातून काय काय वगळलं? नवीन अधिवेशनापूर्वी मोठा बदल

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दावा केला होता की, खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे आरोप केले आहेत. कॅनडाचा नागरिक आणि दहशतवादी निज्जरची जूनमध्ये सरे येथील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भारताने हा आरोप फेटाळला होता.

यानंतर अमेरिकेने असा दावा केला होता की, त्यांनी आणखी एक खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नून यांच्या हत्येचा प्रयत्न हाणून पाडला होता. अमेरिकेने असा दावा केला आहे की पन्नून हा अमेरिकन-कॅनडियन नागरिक होता ज्याची हत्या करण्याचा कट भारतीय नागरिक निखिल गुप्ता आणि एका अज्ञात भारतीय सरकारी अधिकाऱ्याने रचला होता.

RAW Agents in Pakistan
Union Ministers : खासदारकी संपूनही मंत्रिपद कायम ; केंद्रातील सात मंत्र्यांना पूर्वीच्या कायदेशीर अभिप्रायाचा आधार

अमेरिकेने असा दावा केला आहे की, पन्नून हा अमेरिकन-कॅनडियन नागरिक असून निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाने आणि एक अज्ञात भारतीय सरकारी अधिकारी यांच्या हत्येचा कट रचला होता.

अमेरिकेच्या आरोपांदरम्यान, भारताने सांगितले की ते "संघटित गुन्हेगार, दहशतवादी आणि इतर यांच्यातील संबंधांबद्दल" तपासणी करत आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते, "भारत अशा प्रकारच्या गोष्टींना गांभीर्याने घेतो, कारण त्याचा आपल्या स्वतःच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हितावरही परिणाम होतो".

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com