pm narendra modi
sakal
नवी दिल्ली - कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी जबाबदार प्रशासनाची स्पष्ट चौकट उभारणे आणि ‘एआय’चे लोकशाहीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानव इतिहासातील परिवर्तनकारी टप्पा असून, तिचा उपयोग मानवकल्याण, समावेशक विकास आणि जागतिक सहकार्यासाठी व्हायला हवा, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. भारताचा मानवकेंद्री दृष्टिकोन मांडताना मोदींनी ‘मानव’ ही संकल्पना मांडली.