Air India Flight Returned Mid-Air
esakal
दिल्लीहून कॅनडातील व्हँकुव्हरकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाबाबत एक धक्कादायक आणि गोंधळ निर्माण करणारी घटना समोर आली आहे. चुकीचे विमान पाठविल्यामुळे तब्बल आठ तास हवेत राहिल्यानंतर हे विमान माघारी बोलवावे लागले. कॅनडामध्ये विशिष्ट प्रकारच्या विमानांनाच परवानगी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे विमान कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.