बंगळूर : कर्नाटकचे अवजड उद्योग आणि विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम. बी. पाटील (M. B. Patil) यांनी मंगळवारी (ता. ३) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आलमट्टी धरणाच्या उंचीच्या मुद्द्यावरून अनावश्यक वाद निर्माण करू नका, असे आवाहन केले.