'जम्मूतील लोकांवरील अन्याय संपला आहे, हे सांगण्यासाठी मी आलो'

आता या तीन परिवारांची दादागिरी चालणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.
 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा esakal

श्रीनगर : तीन कुटुंबांनी ७० वर्षांपर्यंत जम्मू-काश्मीरला काय दिले, असा निशाणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पीडीपी, नॅशनल काॅन्फ्रन्स आणि काँग्रेस या तीन पक्षांवर साधला आहे. शहा हे सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते. शहा म्हणाले, की तीन कुटुंबांनी ७० वर्षांपर्यंत जम्मू-काश्मीरला काय दिले, ८७ आमदार, ६ खासदार. मोदींनी ३० हजार लोकांना निवडून आणण्याचे काम केले आहे. प्रत्येक गावांत पंचायतीची स्थापना करण्यात आली आहे. आता या तीन परिवारांची दादागिरी चालणार नाही, असा इशारा शहा यांनी दिला. कालपर्यंत (Narendra Modi) या तीन कुटुंबांतील सदस्य मला विचारत होते की काय देऊन जाणार नाही. मी तर हिशोब घेऊन आला आहे की काय देऊन जाणार आहे. मात्र ७० वर्षे तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) राज्य केले. तुम्ही काय दिले असा प्रतिप्रश्न गृहमंत्री अमित शहा यांनी विचारला.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
आर्यन खानला नशामुक्ती केंद्रात पाठवा, शाहरुखला आठवल्यांचा सल्ला

जम्मूतील लोकांवरील अन्याय संपला आहे, हे सांगण्यासाठी मी जम्मूत आलो असल्याचे शहा यांनी सांगितले. आता तुमच्यावर कोणी अन्याय करु शकत नाही. येथे जो विकास युग सुरु आहे. त्यात अडथळा आणला जात आहे. मात्र विकास युगावर कोणताही परिणाम होणार नाही, असा आशावाद गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com