
Amit Shah
sakal
पाटणा : ‘‘विरोधकांकडून मतचोरीचे खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेला सत्य सांगावे आणि त्याबरोबरच विरोधकांची राज्यात सत्ता आल्यास घुसखोरीला बळ मिळेल, असेही सांगावे,’’ असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले.