अमिताभ यांनी फेडले 2 हजार शेतकऱ्यांचे कर्ज 

amitabh bachchan
amitabh bachchan

मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील तब्बल दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. 

अमिताभ यांनी या शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्याची माहिती स्वत: ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. याबाबतचे आश्वासन त्यांनी यापूर्वीच दिले होते. अखेर त्यांनी बुधवारी माहिती उघड करत शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्याचे सांगितले. याशिवाय, पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी अर्थसहाय्य केले आहे.

अमिताभ यांनी लिहिले आहे, की मी दिलेले वचन पूर्ण केले आहे. बिहारमधील 2100 कर्जबाजारी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि वन टाइम सेटलमेंट (OTS) माध्यमातून त्यांची सर्व थकबाकी फेडण्यात आली आहे.  कर्ज फेडलेल्या सर्वांना मुंबईत बोलावून श्वेता आणि अभिषेकने धनादेश दिले आहेत. 

अमिताभ यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केलेली आहे. अमिताभ यांनी उत्तर प्रदेशातील 1398 आणि महाराष्ट्रातील 350 शेतकऱ्यांना अर्थसहाय्य केलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com