Political Leaders Respond to Actor's Claims on Shivaji Maharaj's Agra Escape : आग्रा येथून सुटका करून घेताना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन सुटून करून घेतली होती, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकताच केला होता. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत, अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनीही यावरून राहुल सोलापूरकर यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.