राहुल गांधी देशात द्वेषाची बीजं पेरत आहेत; केंद्रीय मंत्र्याचा गंभीर आरोप

Anurag Thakur vs Rahul Gandhi
Anurag Thakur vs Rahul Gandhiesakal
Summary

'ज्याचा स्वतःचा भ्रष्टाचार आणि दंगलीचा इतिहास आहे, त्याच्याकडून तुम्ही अशाच विधानाची अपेक्षा करू शकता.'

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी आज (बुधवार) काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'द्वेषाचा बुलडोझर' या विधानाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. केंद्रीय मंत्री म्हणाले, राहुल गांधी देशात द्वेषाची बीजं पेरत आहेत. शिवाय, माजी अध्यक्ष राहुल गांधी देशाचं नाव बदनाम करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अनुराग ठाकूर पुढं म्हणाले, ज्याचा स्वतःचा भ्रष्टाचार आणि दंगलीचा इतिहास आहे, त्याच्याकडून तुम्ही अशाच विधानाची अपेक्षा करू शकता. राहुल गांधी देशात द्वेषाची पेरणी करत असून देशाचं भलं झालेलं त्यांना पहावत नाहीय. ते फक्त देशाची प्रतिमा मलिन कशी करता येईल, यावर त्यांचं लक्ष आहे, असा आरोप त्यांनी केलाय.

Anurag Thakur vs Rahul Gandhi
जहांगीरपुरीसारखा हिंसाचार कसा थांबवायचा? किरण बेदींनी सांगितला उपाय

काँग्रेस नेत्यानं ट्विट केलंय की, भाजपकडून (BJP) आठ वर्षांत फक्त मोठं-मोठं बोलणंच झालं, त्यामुळं देशात आता केवळ आठ दिवसांचा कोळसा साठा शिल्लक राहिलाय. मोदीजी, देशात मंदी सुरु झाली असून वीज खंडित झाल्यानं लघुउद्योग उद्धवस्त होत आहेत. त्यामुळं अधिक रोजगार कसं निर्माण होतील यासाठी प्रयत्न करावेत. याकरिता द्वेषाचा बुलडोझर थांबवा आणि वीज प्रकल्प सुरू करा, असं त्यांनी म्हंटलं होतं. याला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com