Arvind Kejriwal : हरियाना सरकारने यमुनेत मिसळले विष; केजरीवाल यांचा आरोप; आयोगाकडून दखल
Yamuna River : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा सरकारवर यमुना नदीत विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला आहे. केजरीवाल यांच्यानुसार, दिल्ली जल बोर्डाने या विषारी पाण्याला दिल्लीच्या सीमेत प्रवेश करण्यापासून रोखले.
नवी दिल्ली : ‘‘हरियानातील भाजप सरकारने यमुना नदीत विष मिसळले असून दिल्ली जल बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हे पाणी सीमेवरच अडविले आहे. जर हे विषयुक्त पाणी दिल्लीत आले असते तर किती लोकांचा मृत्यू झाला असता, याची कल्पना करवत नाही.