

दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या कथित प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जंतरमंतरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तीव्र हल्लाबोल केला.आपण कट्टर प्रामाणिक असल्याचे सांगून त्यांनी आव्हान दिले की जर कोणी लाच घेतल्याचे सिद्ध करू शकले तर ते राजकारण सोडतील. त्यांनी असा दावा केला की पंतप्रधान मोदी त्यांचा द्वेष करतात आणि म्हणूनच त्यांनी चौकशी सुरू केली.