स्वतंत्र्यानंतर चांगल्या सरकारी शाळा बनवल्या असत्या तर देश गरीब नसता- केजरीवाल

शाळा या महासागरातील थेंबासारख्या आहेत
Kejriwal & Modi
Kejriwal & Modi Sakal

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांना संबोधीत करताना म्हणाले की 'मेक इंडिया नंबर-1' मोहिमेशी लोकांना जोडण्यासाठी देशभरात दौरे करणार आहे. केजरीवाल यांनी सांगितले की, ही मोहीम बुधवारी हरियाणातील त्यांच्या जन्मस्थळापासून सुरूवात करणार आहे.

यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, जोपर्यंत प्रत्येक मुलाला मोफत "प्रथम श्रेणी" शिक्षण मिळत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. पुढे म्हणाले स्वतंत्र मिळाल्यानंतर लगेच गावागावात चांगल्या सरकारी शाळा बनवल्या असत्या तर देश गरीब राहिला नसता. आपण 75 वर्षे वाया घालवली आहेत. त्याचवेळी बोलताना केजरीवालांनी नरेंद्र मोदी यांना अपील केली की देशात पुढच्या 5 वर्षात 10 लाख शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सगळ्या राज्यांना सोबत घेवून एक सरकारी योजना तयार करावी.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम-श्री योजने अंतर्गत देशभरात 14,500 शाळा विकसित करून श्रेणीसुधारीत करण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल म्हणाले ही खुप चांगली बातमी आहे, परंतु 14,500 शाळा या महासागरातील थेंबासारख्या आहेत. मी पंतप्रधानांना विनंती करतो की देशातील सगळ्या 10.5 लाख सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करण्यात यावे. .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com