दिल्ली : संजय राऊतांच्या अटकेनंतर त्याचे पडसाद राज्यसभेतही पहायला मिळाले आहे. राज्यसभेतील खासदारांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत भारतावरही श्रीलंकेसारखी वेळ येईल आणि लोकं पंतप्रधान कार्यालयात घुसतील असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
(Asaduddin Owaisi On BJP)
सरकारने महगाई, बेरोजगारी या प्रश्नावर तोडगा काढला नाही. त्यामुळे आता येथील लोकं रस्त्यावर उतरू लागले आहेत. अग्निवीर योजना असेल किंवा शेतकरी आंदोलन असेल लोकं रस्तावर उतरून सरकारप्रती असलेला असंतोष बाहेर येऊ लागला आहे. "बेरोजगारीच्या मुद्द्यावर उद्या लोकं पंतप्रधान कार्यालयातही घुसतील आणि पंतप्रधानाला म्हणतील की, मला नोकरी का नाही दिली?" असं मत ओवैसीने व्यक्त केलं आहे.
सभागृहाचे कामकाज वर्षातले फक्त ६० ते ६५ दिवस चालते आणि त्यातही जर सभागृहाचं कामकाज अशा प्रकारे स्थगित होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न कसे मांडायचे असा सवाल ओवैसी यांनी केला आहे. दरम्यान राजस्थानमधील कन्हैयालाल यांची नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे हत्या करण्यात आली होती. ज्यावेळी कन्हैयालाल याने पहिल्यांदा पोलिसांत तक्रार दाखल केली होती त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता असं वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.