बोट दुर्घटनेतील दोघे बेपत्ता असून एका महिलेचा यात मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी दिली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
आसाममध्ये बुधवारी सांयकाळी ब्रह्मपुत्रा नदीत नाव उलटली. दोन बोटींची धडक झाल्यानंतर एक बोट नदीत बुडाली. यात दुर्घटनेनंतर ३० हून अधिक लोकांनी स्वत:चा जीव वाचवला. याशिवाय 45 जण बेपत्ता होते. जवळपास 45 जणांना वाचवण्यात यश आले आहे. बोट दुर्घटनेतील दोघे बेपत्ता असून एका महिलेचा यात मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी दिली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, माजुली इथे दोन बोटींची समोरा समोर धडक झाली. दोन्ही बोटी या माजुली घाटापासून १०० मीटर अंतरावर होत्या. यात २५ ते ३० दुचाकीसुद्धा होत्या अशी माहिती समोर आली आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत काल माहिती देताना म्हटलं होतं की, दोन बोटी धडकल्यानंतर एक बोट बुडाली होती. यात किती लोक होते याची माहिती मिळणं कठीण आहे. मात्र बोटीवरील ४२लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. बुधवारी रात्री ४ जण बेपत्ता होते अशी माहिती त्यांनी दिली होती.
एनडीआरएफचे पथकाकडून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. राज्याचे मंत्री बिमल बोहरा यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले होते. तसंच आज मुख्यमंत्री निमती घाटावर जाणार आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.