अन्यथा उशीर होईल; राज्यसभेतील कामकाजाबाबत व्यंकय्या नायडूंनी व्यक्त केली नाराजी

आज राज्यसभेतील 72 खासदार निवृत्त होत आहेत. त्यावेळी आयोजित निरोपसमारंभावेळी ते बोलत होते.
एम. व्यंकय्या नायडू
एम. व्यंकय्या नायडूSakal

नवी दिल्ली : विविध विषयांवरील चर्चेदरम्यान विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे (Rajya Sabha) कामकाज अनेकवेळा तहकुब करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या चार वर्षात राज्यसभेचे कामकाजात विरोधकांमुळे महत्त्वाच्या वेळेपैकी तब्बल 35 टक्क्यांपेक्षा अधिकवेळा वाया गेला आहे, असे राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू (M Venkaiah Naidu) यांनी सांगितले आहे. हा सर्व प्रकार अस्वस्थ करणारा असून, खूप उशीर होण्यापूर्वी याला आळा घालण्याची गरज आहे, असेदेखील नायडू यांनी सांगितले. आज राज्यसभेतील 72 खासदार निवृत्त झाले त्यावेळी त्यांना देण्यात येणाऱ्या निरोपसमारंभावेळी ते बोलत होते. (M Venkaiah Naidu On Rajya Sabha Working Culture)

यावेळी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते. अनुभवाला स्वतःचे खूप महत्त्व आहे. असे अनुभवी सोबती घर सोडून गेल्यावर घराचे व राष्ट्राचे मोठे नुकसान होते. म्हणूनच अनुभवी लोक निघून गेल्यावर इथे असलेल्यांची जबाबदारी आणखीनच वाढते, असे मत मोदी यांनी खासदारांच्या निरोपसमारंभाप्रसंगी व्यक्त केले.

या संसदेत आपण बराच काळ घालवला आहे. या सदनाने आपल्या जीवनात जेवढं योगदान दिलं, ते आपण सभागृहासाठी दिलेल्या योगदानापेक्षा जास्त आहे. या सभागृहाचा सदस्य म्हणून जमवलेला अनुभव सदस्यांनी देशाच्या चारही दिशांना नेला पाहिजे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू, उपसभापती हरिवंश आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत फोटो सेशन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com